शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

धुवाधार पाऊस; पंचगंगेच्या पातळीत वाढ

By admin | Updated: July 27, 2015 00:43 IST

गगनबावड्यात अतिवृष्टी : पंचगंगा, भोगावती व कासारी नद्यांवरील बारा बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढला आहे. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर आज, सोमवारी सकाळपर्यंत पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडू शकते. पंचगंगा, भोगावती व कासारी नद्यांवरील बारा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. रविवारी सकाळपासून पावसाची रिपरिप राहिली. दुपारी बारानंतर त्याने काहीशी विश्रांती घेऊन दुपारी अडीचनंतर पुन्हा दमदार सुरुवात केली. दुपारी चार ते सायंकाळी सहापर्यंत पावसाने एकसारखे झोडपल्याने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी दिसत होते. सुटीचा दिवस असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पावसात तारांबळ उडाली. ग्रामीण भागातही दमदार पाऊस सुरू आहे. गगनबावडा तालुक्यात चोवीस तासांत ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असून राधानगरी धरणक्षेत्रात ८०, वारणा परिसरात २५, कासारी धरणक्षेत्रात ७०, तर कुंभी धरणक्षेत्रात १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरण ६२ टक्के, वारणा ८१, तर दूधगंगा ५२ टक्के भरले आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद ८१५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. भोगावती, कुंभी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पसरले असून, पंचगंगेची पातळी सायंकाळी सातपर्यंत २२ फुटांपर्यंत पोहोचली होती. रात्रभर असाच पाऊस राहिला तर आज, सोमवारी सकाळपर्यंत पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. शिरोळ, तेरवाड बंधारा पाण्याखाली कुरुंदवाड : पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पंचगंगेचे पाणी यंदा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे तालुक्यातील तेरवाड, शिरोळ बंधारा पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, तालुक्यात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.जुलै महिना संपला तरी अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. सोयाबीन, भुईमूग, फळभाज्यांसह इतर पिकांची वाढ खुंटली आहे. गेल्या चार दिवसांपासून वातावरणात फरक पडून ढगाळ वातावरण झाले असले तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. मात्र, धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून पाऊस होत असल्याने पाण्याचा विसर्ग होत असल्याने पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे या नदीवरील तेरवाड व शिरोळ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. (वार्ताहर)