शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

पावसाचे आगरही दुष्काळाच्या छायेमध्ये

By admin | Updated: September 6, 2015 22:54 IST

दहा तलाव कोरडे : शिराळा तालुक्यात बरसला निम्माच पाऊस, चांदोली धरणाचा सांडवा दहा वर्षांत पहिल्यांदाच कोरडा

विकास शहा= शिराळा  शिराळा तालुका हा पावसाचे आगर. मात्र यावेळी सप्टेंबर महिना आला तरीही तालुक्यात निम्म्यापेक्षाही कमी पाऊस झाल्याने १० पाझर तलाव कोरडे पडले आहेत, तर इतर २९ तलावात ५० टक्केसुद्धा पाणीसाठा नाही.पावसाच्या दडीमुळे चांगली उगवण झालेली पिके करपू लागली आहेत, तर जनावरांना वैरण व पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. चांदोली धरणातून यावर्षी पूजनासाठी फक्त पाणी सोडण्यात आले. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच हा सांडवा कोरडा आहे.तालुक्यात ५४०९० हेक्टर क्षेत्र पिकाखालील आहे. त्यापैकी जिरायती ४७४७६, तर बागायती क्षेत्र ६६१८ हेक्टर आहे. खरीप हंगामात २६९५० हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. धूळवाफेवर भात पेरण्या झाल्या, यानंतर काही प्रमाणात पाऊस पडला. जुलै महिनाअखेर पिकांना जीवदान मिळेल, असा पाऊस झाला होता. त्यामुळे दुबार पेरण्यांचे संकट टळले होते. मात्र मुसळधार पाऊस एकदाही न झाल्याने पाझर तलाव, धरणांमध्ये पाणीसाठा होऊ शकला नाही.मात्र आॅगस्ट महिना जवळजवळ कोरडाच गेला. त्यामुळे ४९ पाझर तलावांपैकी निगडी (जुना), बेलदारवाडी, कोंडाईवाडी नंबर २, शिरसवाडी, औंढी, शिरशी जुना, शिरशी (भैरवदरा), शिवरवाडी, पावलेवाडी नं. १, भटवाडी हे १० तलाव कोरडेच आहेत, तर पाडळी (३० टक्के), पणुंबे्र तर्फ शिराळा नं. १ (१५), करमाळा नं. १ (३०), खेड (२०), पाडळीवाडी (२०), वाकुर्डे खुर्द (३५), अंत्री खुर्द (४०), निगडी महारदरा (२०), आटुगडेवाडी मेणी (३५), वाडीभागाई (३५), तडवळे (३०), हत्तेगाव (५०), गवळेवाडी उंदीरखोरा (४०), गवळेवाडी बहिरखोरा (५०), हातेगाव अंबाबाईवाडी (४५), धायवडे कुंडनाला (३५), मेणी साकु्रंपीनाला (४०), बादेवाडी (४५), शिरशी कासारकी (३०), कोंडाईवाडी नं. १ (२५), चव्हाणवाडी (३०), वाकुर्डे बुद्रुक जामदाड (३०), चरणवाडी नं. १ (२०), कापरी (४०), बिऊर (४५), खिरवडे (५०), शिरशी काळेखिंड (१०), भैरेवाडी (२०), पाचुंबी (३५), तडवळे नं. १ (२०), पावलेवाडी नं. २ (२०), भाटशिरगाव (३५), रेड क्र. २ (६०), पणुंब्रे तर्फ शिराळा नं. २ (२०), करमाळे नंबर २ (२०), निगडी खोकडदरा (१०), लादेवाडी (२०), इंग्रुळ (२०), सावंतवाडी (३० टक्के) एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. पाऊस न झाल्याने जनावरांच्याचाऱ्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे. तालुक्यात चांगला पाऊस होतो. त्यामुळे जुलै महिन्यातच सर्व धरणे, पाझर तलाव भरतात. मात्र यावर्षी पाऊस नसल्याने ५० टक्के सुद्धा पाणी नाही. शिराळा तोरणा ओढ्यास एकदाही पूर आलेला नाही. अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे.यावर्षी सुरुवातीस पिके चांगली होती. ही पिके जोमात यायला आणि पाऊस गायब व्हायला. त्यामुळे आता सोयाबीन, भात, ऊस आदी पिके करपू लागली आहेत. तसेच वाढही खुंटली आहे. वाकुर्डे योजनेचे पाणी सोडल्यास उत्तर भाग तसेच मोरणा नदीकाठास पाणी मिळू शकेल.चांदोली धरण जुलै, आॅगस्ट महिन्यात भरते. त्यानंतर वीजनिर्मिती केंद्र व सांडव्यातून पाणी सोडले जाते. मात्र यावर्षी फक्त पाणी पूजनासाठी चार दरवाजांतून पाणी सोडण्यात आले व ते लगेच बंद करण्यात आले. गेल्या दहा वर्षात या दरवाजातून पाणी न सोडण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे सांडवा कोरडा आहे. सध्या धरणात ९४.५५ टक्के म्हणजे ३२ टीएमसी पाणीसाठा आहे.संपूर्ण आॅगस्ट महिना कोरडा गेला आहे. त्याचबरोबर कडक उन्हामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेली पिके करपू लागली आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मंडलनिहाय ६ सप्टेंबरअखेरचा पाऊसमंडल वर्ष २०१२ २०१३२०१४२०१५शिराळा५९८८२६९८८३९४शिरशी४५०१०५८५०७३१५कोकरुड१३१५१४३११२७३७६८चरण१२६६१३९०१४९१६६६मांगले७०२८०९१०१६४५०सागाव६०१८५६८७९४२०चांदोली धरण२१७७२८७०२८४४१४५३