शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस थांबला, तब्येत सांभाळा; उन्हाचा चटका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:25 IST

राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : ऑगस्ट महिन्यात पावसाने एकदमच दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सगळेच अडचणीत आले आहेत. पाऊस ...

राजाराम लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : ऑगस्ट महिन्यात पावसाने एकदमच दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सगळेच अडचणीत आले आहेत. पाऊस थांबला आणि उन्हाचा कडाका वाढल्याने त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम झाला आहे. अशा वातावरणात ताप, थंडी, डोकेदुखीसह इतर आजाराने डोके वर काढल्याने नागरिकांनी आरोग्य सांभाळण्याची गरज आहे.

जुलै महिन्यात चार दिवसांत विक्रमी पाऊस कोसळल्याने सगळीकडे महापुराने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. २४ जुलैनंतर पावसाने उसंत घेतल्यानंतर पूर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली. त्यानंतर पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरू राहिला. ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिली. पडेल तिथे पडेल असाच पाऊस राहिला. २५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी १३० मिलिमीटर पाऊस झाला. साधारणत: ऑगस्ट महिन्यात ४७७ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो, म्हणजेच केवळ २७ टक्के पाऊस झाला.

आकडेवारी काय सांगते?

महिना अपेक्षित पाऊस झालेला पाऊस किमान तापमान कमाल तापमान

जून ३३९.९ मिमी ३९७.९ मिमी २६ डिग्री ३४ डिग्री

जुलै ७५७ मिमी ७४०.४ मिमी २५ डिग्री ३० डिग्री

ऑगस्ट ४७७ मिमी १३० मिमी २४ डिग्री ३१ डिग्री

ऑगस्टमध्ये सर्वांत कमी पाऊस

ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात सरासरी ५२५ मिलिमीटर पाऊस हाेतो. २०१९ मध्ये एकाच महिन्यात सरासरी १०९३ मिलिमीटर नोंद झाली. मात्र, यंदा सरासरी १३० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

कोठे किती पाणीसाठा टीएमसीमध्ये

प्रकल्प पाणी साठा टक्केवारी

राधानगरी ७.८७ ९४

तुळशी ३.४६ ९९

वारणा ३१.५० ९२

दूधगंगा २३.५६ ९३

कासारी २.४७ ८९

कडवी २.४९ ९९

कुंभी २.४८ ९१

पाटगाव ३.४४ ९३

मागील पाच वर्षांतील ऑगस्ट महिन्यातील पर्जन्यमान, मिलिमीटरमध्ये

वर्ष एकूण पडलेला पाऊस सरासरी पाऊस

२०१६ ५४६७ ४५३

२०१७ २१५९ १७९

२०१८ ५७३४ ४७७

२०१९ १३११६ १०९३

२०२० ६७८२ ५६५

२०२१ १९०४ १३०

तापाची फणफण वाढली...

वाढलेल्या तापमानाचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, यामुळे ताप, खोकला, डोकेदुखीने डोके वर काढले आहे. त्यातच महापुराचे पाणी येऊन गेलेल्या गावांत चिकुनगुनिया, डेंग्यू, टायफॉइडने नागरिक त्रस्त आहेत. यासाठी नागरिकांनी विनाकारण उन्हात बाहेर पडू नये, अशा वातावरणात काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ. आनंद सूर्यवंशी यांनी सांगितले.