शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

पाऊस गाण्यांनी मने ओलावली

By admin | Updated: July 23, 2015 00:12 IST

‘घन ओथंबून येती’ : सांगितीक मैफलीत मराठी, हिंदी गाण्यांची बरसात

कोल्हापूर : मनाला प्रफुल्लित करणाऱ्या पावसाळ्यात रसिकांच्या प्रतिसादाला ओ देत गंधार प्रस्तुत ‘घन ओथंबून येती’ या बुधवारी सायंकाळी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या सांगितीक मैफलीत नव्या-जुन्या मराठी व हिंदी पावसाच्या गाण्यांत रसिक ओले चिंब झाले. कार्यक्रमाची सुरुवात ‘घनन घनन’ या समूहगीताने झाली. ‘श्रावणात घन निळा’ या पूजा पाटील यांनी गायलेल्या गाण्याने तर रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तुषार पाटील यांच्या ‘भेट तुझी माझी स्मरते’ आणि ‘कधी तू’ या प्रल्हाद जाधव यांच्या गायनाने रसिकांना डोलायला लावले. निशांत गोंधळी यांच्या ‘वासाचा पयला’, तर ‘नभ उतरू आलं’ या प्रत्यंचा राजाज्ञा यांच्या गाण्याने तर एक उंची गाठली. अखंड दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या कार्यक्रमात बाहेर पडत असलेल्या हलक्याशा पावसाचा फील निशांत गोंधळी यांच्या ‘गारवा’ या गाण्याने सभागृहातही आणला. पूजा पाटील यांनी ‘ढग दाटूनी येतात’ हे गीत सादर करीत रसिकांच्या अपेक्षा आणखी वाढविल्या. उत्तरोत्तर रंगत चाललेल्या या कार्यक्रमात प्रत्यंचा राजाज्ञा यांच्या ‘राया मला पावसात’ या गाण्याने तर कार्यक्रमाची उंची आणखी वाढविली. ‘नाच रे मोरा’, ‘भिजून गेला वारा’ या प्रल्हाद आणि पूजा यांंनी गायलेल्या, तर ‘चिंब पावसानं’ या निशांत, पूजा यांनी गायलेल्या गाण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली. प्रल्हाद जाधव यांनी ‘रिमझिम गिरे सावन’ हे हिंदी गीत गायले. अखेरच्या टप्प्यात ‘भरलं आभाळ’, ‘चिंब भिजलेले’, ‘मेघा रे... मेघा रे...’ या गाण्यांनी तर रसिकांना आणखी खुर्चीला खिळवून ठेवले. कार्यक्रमाची सांगता प्रल्हाद जाधव यांच्या ‘वो कागज की कश्ती’ या गीताने झाली. या कार्यक्रमात संदेश खेडेकर (तबला), नरेंद्र पाटील (आॅक्टोपॅड), गुरू ढोले (ढोलकी), शिवाजी सुतार (सिंथेसायझर), केदार गुळवणी (व्हायोलियन), भूषण साठम (गिटार) यांनी साथ दिली. रोहिणी वाघमोडे व निशांत गोंधळी यांनी बहारदार निवेदन केले. (प्रतिनिधी)