शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

प्रारुप मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:03 IST

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होणार असल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने तयारी सुरू ...

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होणार असल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मंगळवारी ८१ प्रभागांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आणि त्यातील चुका पाहून अनेक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते चक्रावून गेले आहेत. पाचशे ते दीड हजार मतदारांची नावे एक प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मतदार यादीचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याचे स्पष्ट होत आहे.

बिंदू चौक प्रभागातील ७६९ मतदारांची नावे ही शेजारच्या प्रभाग क्रमांक ३१ बाजारगेट या प्रभागात समाविष्ट झाली आहेत. तसेच १४५४ मतदारांची नावे ही प्रभाग क्रमांक २७ ट्रेझरीला जोडली गेली आहेत. प्रभागाच्या हद्दीमध्ये कोणताही बदल झाला नसताना इतकी नावे एक प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत माजी नगरसेवक ईश्वर परमार यांनी हरकत घेतली आहे.

राजारामपुरी विभागीय कार्यालयांतर्गत बुद्ध गार्डन प्रभागात एकूण ४५०० मतदारांचा समावेश असून त्यातील ३१०० नावेच प्रारूप मतदार यादीत दिसतात. अन्य नावे शेजारच्या प्रभागांत विभागली गेली आहेत. १५० हून अधिक मृतांची नावे आहेत, तर ११२ मतदारांची नावे डबल झाली आहेत.

- शिवाजी मार्केट कार्यालयाच्या चुका

शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाकडून मोठ्या चुका झाल्याची बाब समोर आली आहे. सर्वाधिक ७५ हरकती याच प्रभागातील आहेत. या विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण असून त्यांच्या कामाबाबत अधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा नाराजी व्यक्त केली आहे. प्रारूप मतदार याद्या तयार करण्यातही त्यांच्याकडून हलगर्जीपणा झाला असल्याचे हरकतींवरून स्पष्ट होत आहे.

- प्राप्त हरकतींची संख्या अशी -

- गांधी मैदान कार्यालय - १४

- शिवाजी मार्केट कार्यालय - ७५

- राजारामपुरी कार्यालय - १

- ताराराणी मार्केट कार्यालय - २

- सुट्टीच्या दिवशीही हरकती स्वीकारणार

आज, शुक्रवारपासून महापालिकेला सलग तीन दिवस सुट्ट्या आहेत. परंतु तक्रारी, हरकतींची संख्या लक्षात घेता आणि अंतिम मतदार यादी तयार करण्याचा कालावधी कमी असल्यामुळे तिन्ही दिवस सुट्टी असूनही कामकाज चालणार आहे. हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. ज्या हरकती योग्य आहेत, त्यांची दुरुस्तीही करण्यात येणार आहे.