शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सकाळी पाऊस, दुपारनंतर उघडीप

By admin | Updated: June 26, 2015 01:05 IST

शहरातील चित्र : पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ; जिल्ह्यातील २६ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : सकाळी पाऊस आणि दुपारनंतर उघडीप असे वातावरण शहर आणि परिसरात राहिले. मात्र, तळकोकणात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे जिल्ह्यातील कोल्हापूर पद्धतीचे २६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ५३३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.गेले दोन दिवस शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. उन्हाळ्यात वारंवार झालेला वळीव व दोन दिवसांपासून पडणारा जोरदार पाऊस यांमुळे नदी, ओढे भरून वाहत आहेत. सखल भागांत पाणी तुंंबले आहे. हवेत कमालीचा गारठा आहे. पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. शेतकरी शेतात थांबलेले पाणी बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. भाताच्या रोपलागणीला वेग आला आहे. गुरुवारी सकाळी ११ पर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. तीन दिवसांनंतर दुपारी उन्हाचे दर्शन झाले. ढगाळ वातावरण व वारा यांमुळे गारठा कायम राहिला.गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर गेल्याने काठावरील मंदिरांत पाणी गेले आहे. त्याचबरोबर भोगावती, कुंभी, कासारी, वारणा, वेदगंगा, हिरण्यकेशी नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, शिंगणापूर; तर भोेगावती नदीवरील हळदी, राशिवडे, खडक कोगे, सरकारी कोगे आणि कासारी नदीवरील कांटे, पेंडाखळे, करंजफेण, बाजारभोगाव, यवलूज, ठाणे, आळवे, पुनाळ, तिरपण; तर वेदगंगा नदीवरील बस्तवडे, चिखली, कुरणीतील तीन, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, वारणा नदीवरील माणगाव, चिंचोली, कोडोलीतील दोन असे २६ बंधारे पाण्याखाली आहेत. या मार्गांवरील वाहतूूक पर्यायी मार्गांनी सुरू आहे. पावसाचा ‘महावितरण’ला फटका...गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाल्याने वीजवाहिन्यांवर झाडे व फांद्या पडणे, खांब उन्मळून पडणे यांमुळे महावितरणाला फटका बसला आहे. आठ दिवसांत पावसामुळे विभागातील ७११ खांब कोसळले. यातील ४६० खांब पुन्हा उभे करण्यात आले. १३४ खांब व १० रोहित्रे उभी करण्याचे काम सुरू आहे. खांब पडल्याने व विद्युत तारा तुटल्याने संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित होत आहे. शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा सुरू करण्याचा ‘महावितरण’ प्रयत्न करीत आहे.घटप्रभा ‘फुल्ल’घटप्रभा धरणातून प्रतिसेकंद ३७१३ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोदे लघू पाटबंधारे प्रकल्प ८० टक्के भरला आहे. राजाराम बंधाऱ्यातून ३३६०८, सांगली बंधाऱ्यातून २५१६४, अंकली बंधाऱ्यातून ४८५२०, राजापूर बंधाऱ्यातून ६२२१० घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) हातकणंगले - ६.३, शिरोळ - ३.३, पन्हाळा - ३८, शाहूवाडी - ५१, राधानगरी - ६१.२, गगनबावडा - १२५, करवीर - १५.६, कागल - २१.९, गडहिंग्लज - २५.३, भुदरगड - ३६, आजरा - ६५.८, चंदगड - ८४.७.