शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

पावसाने पळविला तोंडचा घास

By admin | Updated: October 28, 2014 00:19 IST

जिल्ह्यात पंचनामे सुरू : पंचनाम्यासाठी आठवडा लागणार

रत्नागिरी : जिल्ह्यात गेले तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीची मोठी हानी केली आहे. कापणीयोग्य झालेली शेती पावसात भिजली असून, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.जिल्ह्यात पावसाने गेल्या चार दिवसांत कहर केला असून, वादळी वाऱ्यांसह जिल्ह्याच्या विविध भागांत सायंकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत आहे. सध्या भातकापणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे भात कापून ते त्याचठिकाणी वाळत ठेवले जाते. या भाताचेही मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतजमिनीत पाणी साचले असून, त्यावर भात तरंगू लागले आहे.या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी कृषी विभागाला दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात पंचनाम्याच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. तलाठी, ग्रामसेवकांबरोबरच कृषी साहाय्यकांचीही मदत घेतली जाणार आहे. याबाबत जिल्हा कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी सांगितले की, जिल्ह्यात भातशेतीचे तीन प्रकारचे नुकसान झाले आहे. कापून शेतात ठेवलेल्या भाताचे, तसेच गरव्या प्रकारच्या भाताचे नुकसान झाले आहे. गरव्या भाताचा दाणा काळा पडण्याची भीती आहे, तसेच शेतात उभे असलेले पीकही या पावसामुळे नुकसानीत गेले आहे, असे ते म्हणाले.येत्या आठवडाभरात नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील, असे शहा म्हणाले. (प्रतिनिधी)