शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

पावसाने पळविला तोंडचा घास

By admin | Updated: October 28, 2014 00:19 IST

जिल्ह्यात पंचनामे सुरू : पंचनाम्यासाठी आठवडा लागणार

रत्नागिरी : जिल्ह्यात गेले तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीची मोठी हानी केली आहे. कापणीयोग्य झालेली शेती पावसात भिजली असून, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.जिल्ह्यात पावसाने गेल्या चार दिवसांत कहर केला असून, वादळी वाऱ्यांसह जिल्ह्याच्या विविध भागांत सायंकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत आहे. सध्या भातकापणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे भात कापून ते त्याचठिकाणी वाळत ठेवले जाते. या भाताचेही मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतजमिनीत पाणी साचले असून, त्यावर भात तरंगू लागले आहे.या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी कृषी विभागाला दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात पंचनाम्याच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. तलाठी, ग्रामसेवकांबरोबरच कृषी साहाय्यकांचीही मदत घेतली जाणार आहे. याबाबत जिल्हा कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी सांगितले की, जिल्ह्यात भातशेतीचे तीन प्रकारचे नुकसान झाले आहे. कापून शेतात ठेवलेल्या भाताचे, तसेच गरव्या प्रकारच्या भाताचे नुकसान झाले आहे. गरव्या भाताचा दाणा काळा पडण्याची भीती आहे, तसेच शेतात उभे असलेले पीकही या पावसामुळे नुकसानीत गेले आहे, असे ते म्हणाले.येत्या आठवडाभरात नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील, असे शहा म्हणाले. (प्रतिनिधी)