शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

शिरोळ तालुक्याला पर्जन्यमापकांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:19 IST

संदीप बावचे : शिरोळ पाऊस कमी, पण महापुराची हमी असलेल्या शिरोळ तालुक्यात पावसाची नोंद सात केंद्रांवर घेतली जात आहे. ...

संदीप बावचे : शिरोळ

पाऊस कमी, पण महापुराची हमी असलेल्या शिरोळ तालुक्यात पावसाची नोंद सात केंद्रांवर घेतली जात आहे. कृषी व महसूल विभागाकडून एकत्रित मंडलनिहाय पर्जन्यमापकाद्वारे मूल्यमापन करून पावसाची नोंद घेतली जाते. त्यामुळे ही पर्जन्यमापके आधार ठरत आहेत. तीन शहरे व ५२ गावांतून संपूर्ण तालुक्यातील पावसाची सरासरी गृहित धरली जाते.

शिरोळ तालुक्यात कृष्णेसह, वारणा, दूधगंगा व पंचगंगा या चार नद्या बारमाही वाहतात. राजापूर बंधारा वरदान ठरला आहे. तालुक्यात सरासरी ४०० मिलिमीटर पावसाची नोंद होते. मात्र, सन २००५, २००६ व २०१९ सालामध्ये अतिवृष्टीमुळे तालुक्याला महापुराला सामोरे जावे लागले. त्यामुळे ‘पाऊस कमी, पण महापुराची हमी’ अशी परिस्थिती शिरोळ तालुक्याची आहे. जवळपास ४४ हून अधिक गावांना नदीचे पाणी शेतीसाठी वापरले जाते. तर उर्वरित गावांना पावसावर अवलंबून रहावे लागत असलेतरी पर्यायाने कूपनलिका, विहीर यांचा वापर केला जातो.

दरम्यान, पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी शिरोळसह, नृसिंहवाडी, नांदणी, जयसिंगपूर, शिरढोण, कुरुंदवाड व दत्तवाड असे मंडलनिहाय सात ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र आहेत. त्याद्वारे पावसाची नोंद घेतली जाते. मात्र, काही वेळेला अतिवृष्टीचे निकष ठरविताना ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांना नुकसानभरपाई दिली जाईल, असा निकष शासन पातळीवर निघतो. त्याचा फटका शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे पाऊस कमी असणाऱ्या शिरोळ तालुक्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास सरासरी पावसाची नोंद घेण्यात येऊ नये, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

चौकट - याठिकाणी पर्जन्यमापके

शिरढोण, जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ, नृसिंहवाडी, कुरुंदवाड, दत्तवाड अशा सात ठिकाणी तालुक्यात पर्जन्यमापके आहेत.