शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची उघडीप, पण पंचगंगेच्या पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाने काहीसी उसंत घेतली. कोल्हापूर शहरात दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाने काहीसी उसंत घेतली. कोल्हापूर शहरात दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. पावसाची उघडीप असली, तरी पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात दोन फुटांनी वाढ झाली. विविध नद्यांवरील ३२ बंधारे पाण्याखाली असून, राधानगरी धरणातून विसर्ग कमी झाला आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत होता. सोमवारी दिवसभर तर धरणक्षेत्रात धुवांदार पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला होता. त्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत जाऊन पंचगंगेसह सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले होते. सोमवारी रात्रभर जोरदार पाऊस सुरू राहिला. मात्र, मंगळवारी सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली. अधूनमधून भुरभुर वगळता उघडीप राहिली. कोल्हापूर शहरात तर दिवसभर कडकडीत ऊन राहिले. तब्बल चार दिवसांनी मंगळवारी सूर्यनारायणांचे दर्शन झाले. पावसाने उसंत घेतली असली, तरी मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत पंचगंगेची पातळी ३०.६ फुटांवर होते. मात्र, सायंकाळी ती ३२.४ फुटांवर पोहोचली होती. धरणातून विसर्ग सुरू असल्याने पाण्याची पातळी स्थिर राहण्याची शक्यता आहे. अद्याप ३२ बंधारे पाण्याखाली असून, राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १,४०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पडझडीत ४.३६ लाखांचे नुकसान

सोमवारी झालेल्या धुवांदार पावसाने जिल्ह्यात ११ खासगी मालमत्तांची पडझड होऊन, त्यामध्ये ४ लाख ३६ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.