शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

पावसाची उघडीप, पण पंचगंगेच्या पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाने काहीसी उसंत घेतली. कोल्हापूर शहरात दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाने काहीसी उसंत घेतली. कोल्हापूर शहरात दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. पावसाची उघडीप असली, तरी पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात दोन फुटांनी वाढ झाली. विविध नद्यांवरील ३२ बंधारे पाण्याखाली असून, राधानगरी धरणातून विसर्ग कमी झाला आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत होता. सोमवारी दिवसभर तर धरणक्षेत्रात धुवांदार पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला होता. त्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत जाऊन पंचगंगेसह सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले होते. सोमवारी रात्रभर जोरदार पाऊस सुरू राहिला. मात्र, मंगळवारी सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली. अधूनमधून भुरभुर वगळता उघडीप राहिली. कोल्हापूर शहरात तर दिवसभर कडकडीत ऊन राहिले. तब्बल चार दिवसांनी मंगळवारी सूर्यनारायणांचे दर्शन झाले. पावसाने उसंत घेतली असली, तरी मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत पंचगंगेची पातळी ३०.६ फुटांवर होते. मात्र, सायंकाळी ती ३२.४ फुटांवर पोहोचली होती. धरणातून विसर्ग सुरू असल्याने पाण्याची पातळी स्थिर राहण्याची शक्यता आहे. अद्याप ३२ बंधारे पाण्याखाली असून, राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १,४०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पडझडीत ४.३६ लाखांचे नुकसान

सोमवारी झालेल्या धुवांदार पावसाने जिल्ह्यात ११ खासगी मालमत्तांची पडझड होऊन, त्यामध्ये ४ लाख ३६ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.