शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
4
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
5
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
6
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
7
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
8
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
9
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
10
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
11
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
12
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
13
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
14
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
15
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
16
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
17
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
18
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
19
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
20
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...

पावसाची उघडीप...दिवसभर कडकडीत ऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात साेमवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली. कडकडीत ऊन पडल्याने शेतकऱ्यांनी काहीसा सुटकेचा नि:श्वास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात साेमवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली. कडकडीत ऊन पडल्याने शेतकऱ्यांनी काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पाऊस कमी झाल्याने नद्यांचे पुराचे पाणी झपाट्याने कमी होत असून पंचगंगेची पातळी २९ फुटापर्यंत खाली आली आहे.

मागील आठवड्यात सलग चार-पाच दिवस पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने शिवार पाण्याने भरून गेले. खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले तर ऊस पिके आडवी पडल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. खरीप पिके अजून कोवळी असल्याने त्यांना पावसाचा तडाखा सहन झालेला नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी पिके कुजली असून शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.

रविवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होत गेला. सोमवारी तर पावसाने पूर्ण उसंत घेतली. सकाळपासूनच आकाश एकदमच स्वच्छ राहिले. अधूनमधून जिल्ह्यात हलक्या सरी कोसळल्या. कोल्हापूर शहरात मात्र पूर्ण उघडीप राहिली. दिवसभर कडकडीत ऊन राहिल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

नद्यांचे पाणी झपाट्याने कमी होत असून पंचगंगेची पातळी २९ फुटांपर्यंत खाली आली आहे. दिवसभरात दीड फुटाने पातळी कमी झाली असून अद्याप ३२ बंधारे पाण्याखाली आहेत. धरण क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे. राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी प्रति सेकंद १,३०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

खोळंबलेल्या पेरण्यांना गती येणार

अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसाने जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. दोन दिवस पावसाने उसंत घेतली आहे, त्यात कडकडीत ऊन पडल्याने जमिनीला वाफसा आल्यानंतर पेरण्यांना पुन्हा गती येणार आहे.

‘आर्द्रा’ नक्षत्रात जेमतेम पाऊस

‘मृग’ नक्षत्रात धुवांदार पाऊस झाल्याने पावसाचे पुढील ‘आर्द्रा’ नक्षत्र काय करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सूर्याने सोमवारी उत्तर रात्री ‘आर्द्रा’ नक्षत्रात प्रवेश केला. वाहन ‘कोल्हा’ आहे. या काळात कोकणात जोरदार तर पश्चिम महाराष्ट्रात जेमतेम पाऊस राहील, असा अंदाज आहे.