शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

पावसाची उघडीप...दिवसभर कडकडीत ऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात साेमवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली. कडकडीत ऊन पडल्याने शेतकऱ्यांनी काहीसा सुटकेचा नि:श्वास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात साेमवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली. कडकडीत ऊन पडल्याने शेतकऱ्यांनी काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पाऊस कमी झाल्याने नद्यांचे पुराचे पाणी झपाट्याने कमी होत असून पंचगंगेची पातळी २९ फुटापर्यंत खाली आली आहे.

मागील आठवड्यात सलग चार-पाच दिवस पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने शिवार पाण्याने भरून गेले. खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले तर ऊस पिके आडवी पडल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. खरीप पिके अजून कोवळी असल्याने त्यांना पावसाचा तडाखा सहन झालेला नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी पिके कुजली असून शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.

रविवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होत गेला. सोमवारी तर पावसाने पूर्ण उसंत घेतली. सकाळपासूनच आकाश एकदमच स्वच्छ राहिले. अधूनमधून जिल्ह्यात हलक्या सरी कोसळल्या. कोल्हापूर शहरात मात्र पूर्ण उघडीप राहिली. दिवसभर कडकडीत ऊन राहिल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

नद्यांचे पाणी झपाट्याने कमी होत असून पंचगंगेची पातळी २९ फुटांपर्यंत खाली आली आहे. दिवसभरात दीड फुटाने पातळी कमी झाली असून अद्याप ३२ बंधारे पाण्याखाली आहेत. धरण क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे. राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी प्रति सेकंद १,३०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

खोळंबलेल्या पेरण्यांना गती येणार

अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसाने जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. दोन दिवस पावसाने उसंत घेतली आहे, त्यात कडकडीत ऊन पडल्याने जमिनीला वाफसा आल्यानंतर पेरण्यांना पुन्हा गती येणार आहे.

‘आर्द्रा’ नक्षत्रात जेमतेम पाऊस

‘मृग’ नक्षत्रात धुवांदार पाऊस झाल्याने पावसाचे पुढील ‘आर्द्रा’ नक्षत्र काय करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सूर्याने सोमवारी उत्तर रात्री ‘आर्द्रा’ नक्षत्रात प्रवेश केला. वाहन ‘कोल्हा’ आहे. या काळात कोकणात जोरदार तर पश्चिम महाराष्ट्रात जेमतेम पाऊस राहील, असा अंदाज आहे.