शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

राफेलमध्ये गेलेले हजारो कोटी अंबानीकडून काढून घेऊन शेतकरी, गरिबांना देऊ : राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:11 IST

दादा जनवाडे । लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : कॉग्रेस पक्ष सत्य, न्याय, प्रेम आणि बंधुभाव यासाठी ही निवडणूक लढवत ...

दादा जनवाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनिपाणी : कॉग्रेस पक्ष सत्य, न्याय, प्रेम आणि बंधुभाव यासाठी ही निवडणूक लढवत आहे तर असत्य, अन्याय, विद्वेश आणि खोटेपणा हेच भाजपचे धोरण आहे. त्यामुळे सत्य व न्याय हवा की विद्वेश , खोटेपणा हे ठरवून मतदान करा असे आवाहन कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी शुक्रवारी केले. पंतप्रधान मोदी हे अनिल अंबानीचे चौकीदार आहेत. कॉँग्रेस सत्तेवर आल्यास राफेल सौद्यात देण्यात आलेले हजारो कोटी अनिल अंबानी यांच्याकडून काढून घेवून शेतकरी व गरीब लोकांना देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.चिक्कोडी येथे कॉँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वनमंत्री सतीश जारकीहोळी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव, माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार श्रीमंत पाटील, आमदार महांतेश कौजलगी, आमदार अंजली निंबाळकर, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार गणेश हुक्केरी, यशोमती ठाकूर, माजी वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, रावसाहेब पाटील यांच्यासह उमेदवार व काँग्रेसचे नेते उपस्थित होते.राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा असे सांगितले तर ते याला तयार होत नाहीत; पण अनेक उद्योगपतींची कर्ज त्यांनी माफ केली आहेत. आज ते कृषी क्षेत्रावर व शेतकऱ्यांवर बोलत असले तरी आमच्याच पक्षाच्या कर्नाटक सरकारने शेतकºयांना ४० हजार कोटींची कर्जमाफी दिली. आमच्याच कर्नाटकातील सरकारने उसाला चांगला दर मिळवून दिला. देशातील जनतेला पंधरा लाख देऊ असे सांगून मोदींनी फसवणूक केली; पण काँग्रेसचे सरकार येताच देशातील ५ कोटी महिलांच्या खात्यावर प्रतिवर्षी ७२ हजार रुपये जमा करणार आहे आणि ही केवळ घोषणा नसून हे सत्यात उतरणार आहे. कारण हा निर्णय आम्ही अभ्यास करून घेतला आहे.मोदी सरकारने जीएसटी व नोटाबंदी केल्याने अनेक रोजगार गेले आहेत. प्रत्येक २४ तासात देशात २७ हजार रोजगार जात असून यामुळे बेरोजगारी वाढत आहे. मोदी सरकारने २२ लाख सरकारी जागा भरल्या नसून त्या काँग्रेस सरकार आल्यावर भरल्या जाणार आहेत. नवीन व्यवसाय सुरू करणाºया युवकांना अनेक नियम शिथिल करणार आहे. जे लोक दुसºयाला रोजगार देतील त्यांना मदत करण्याची भूमिका येणारे काँग्रेस सरकार घेणार आहे.कृषीचं वेगळं बजेटकृषी क्षेत्राबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, साधारणत: वर्षातून एकच बजेट केंद्र सरकार मांडत असे, पण आमचं सरकार आल्यास कृषीसाठी वेगळं बजेट असेल. यामध्ये शेतकºयांना अधिकचे उत्पन्न व आर्थिक मदत यावर निर्णय होतील.... मोदींनी वेगळीच संस्कृती दाखवलीराहुल गांधी म्हणाले, मोदी हे नेहमी धर्म व संस्कृती बदल बोलत असतात. आपल्या संस्कृतीत गुरुला खूप महत्त्व आहे; पण मोदींनी आपले गुरू लालकृष्ण अडवाणी यांनाच उमेदवारी नाकारून वेगळीच संस्कृती दाखवली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक