शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

राफेलमध्ये गेलेले हजारो कोटी अंबानीकडून काढून घेऊन शेतकरी, गरिबांना देऊ : राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:11 IST

दादा जनवाडे । लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : कॉग्रेस पक्ष सत्य, न्याय, प्रेम आणि बंधुभाव यासाठी ही निवडणूक लढवत ...

दादा जनवाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनिपाणी : कॉग्रेस पक्ष सत्य, न्याय, प्रेम आणि बंधुभाव यासाठी ही निवडणूक लढवत आहे तर असत्य, अन्याय, विद्वेश आणि खोटेपणा हेच भाजपचे धोरण आहे. त्यामुळे सत्य व न्याय हवा की विद्वेश , खोटेपणा हे ठरवून मतदान करा असे आवाहन कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी शुक्रवारी केले. पंतप्रधान मोदी हे अनिल अंबानीचे चौकीदार आहेत. कॉँग्रेस सत्तेवर आल्यास राफेल सौद्यात देण्यात आलेले हजारो कोटी अनिल अंबानी यांच्याकडून काढून घेवून शेतकरी व गरीब लोकांना देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.चिक्कोडी येथे कॉँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वनमंत्री सतीश जारकीहोळी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव, माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार श्रीमंत पाटील, आमदार महांतेश कौजलगी, आमदार अंजली निंबाळकर, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार गणेश हुक्केरी, यशोमती ठाकूर, माजी वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, रावसाहेब पाटील यांच्यासह उमेदवार व काँग्रेसचे नेते उपस्थित होते.राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा असे सांगितले तर ते याला तयार होत नाहीत; पण अनेक उद्योगपतींची कर्ज त्यांनी माफ केली आहेत. आज ते कृषी क्षेत्रावर व शेतकऱ्यांवर बोलत असले तरी आमच्याच पक्षाच्या कर्नाटक सरकारने शेतकºयांना ४० हजार कोटींची कर्जमाफी दिली. आमच्याच कर्नाटकातील सरकारने उसाला चांगला दर मिळवून दिला. देशातील जनतेला पंधरा लाख देऊ असे सांगून मोदींनी फसवणूक केली; पण काँग्रेसचे सरकार येताच देशातील ५ कोटी महिलांच्या खात्यावर प्रतिवर्षी ७२ हजार रुपये जमा करणार आहे आणि ही केवळ घोषणा नसून हे सत्यात उतरणार आहे. कारण हा निर्णय आम्ही अभ्यास करून घेतला आहे.मोदी सरकारने जीएसटी व नोटाबंदी केल्याने अनेक रोजगार गेले आहेत. प्रत्येक २४ तासात देशात २७ हजार रोजगार जात असून यामुळे बेरोजगारी वाढत आहे. मोदी सरकारने २२ लाख सरकारी जागा भरल्या नसून त्या काँग्रेस सरकार आल्यावर भरल्या जाणार आहेत. नवीन व्यवसाय सुरू करणाºया युवकांना अनेक नियम शिथिल करणार आहे. जे लोक दुसºयाला रोजगार देतील त्यांना मदत करण्याची भूमिका येणारे काँग्रेस सरकार घेणार आहे.कृषीचं वेगळं बजेटकृषी क्षेत्राबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, साधारणत: वर्षातून एकच बजेट केंद्र सरकार मांडत असे, पण आमचं सरकार आल्यास कृषीसाठी वेगळं बजेट असेल. यामध्ये शेतकºयांना अधिकचे उत्पन्न व आर्थिक मदत यावर निर्णय होतील.... मोदींनी वेगळीच संस्कृती दाखवलीराहुल गांधी म्हणाले, मोदी हे नेहमी धर्म व संस्कृती बदल बोलत असतात. आपल्या संस्कृतीत गुरुला खूप महत्त्व आहे; पण मोदींनी आपले गुरू लालकृष्ण अडवाणी यांनाच उमेदवारी नाकारून वेगळीच संस्कृती दाखवली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक