शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

राफेलमध्ये गेलेले हजारो कोटी अंबानीकडून काढून घेऊन शेतकरी, गरिबांना देऊ : राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:11 IST

दादा जनवाडे । लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : कॉग्रेस पक्ष सत्य, न्याय, प्रेम आणि बंधुभाव यासाठी ही निवडणूक लढवत ...

दादा जनवाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनिपाणी : कॉग्रेस पक्ष सत्य, न्याय, प्रेम आणि बंधुभाव यासाठी ही निवडणूक लढवत आहे तर असत्य, अन्याय, विद्वेश आणि खोटेपणा हेच भाजपचे धोरण आहे. त्यामुळे सत्य व न्याय हवा की विद्वेश , खोटेपणा हे ठरवून मतदान करा असे आवाहन कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी शुक्रवारी केले. पंतप्रधान मोदी हे अनिल अंबानीचे चौकीदार आहेत. कॉँग्रेस सत्तेवर आल्यास राफेल सौद्यात देण्यात आलेले हजारो कोटी अनिल अंबानी यांच्याकडून काढून घेवून शेतकरी व गरीब लोकांना देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.चिक्कोडी येथे कॉँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वनमंत्री सतीश जारकीहोळी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव, माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार श्रीमंत पाटील, आमदार महांतेश कौजलगी, आमदार अंजली निंबाळकर, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार गणेश हुक्केरी, यशोमती ठाकूर, माजी वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, रावसाहेब पाटील यांच्यासह उमेदवार व काँग्रेसचे नेते उपस्थित होते.राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा असे सांगितले तर ते याला तयार होत नाहीत; पण अनेक उद्योगपतींची कर्ज त्यांनी माफ केली आहेत. आज ते कृषी क्षेत्रावर व शेतकऱ्यांवर बोलत असले तरी आमच्याच पक्षाच्या कर्नाटक सरकारने शेतकºयांना ४० हजार कोटींची कर्जमाफी दिली. आमच्याच कर्नाटकातील सरकारने उसाला चांगला दर मिळवून दिला. देशातील जनतेला पंधरा लाख देऊ असे सांगून मोदींनी फसवणूक केली; पण काँग्रेसचे सरकार येताच देशातील ५ कोटी महिलांच्या खात्यावर प्रतिवर्षी ७२ हजार रुपये जमा करणार आहे आणि ही केवळ घोषणा नसून हे सत्यात उतरणार आहे. कारण हा निर्णय आम्ही अभ्यास करून घेतला आहे.मोदी सरकारने जीएसटी व नोटाबंदी केल्याने अनेक रोजगार गेले आहेत. प्रत्येक २४ तासात देशात २७ हजार रोजगार जात असून यामुळे बेरोजगारी वाढत आहे. मोदी सरकारने २२ लाख सरकारी जागा भरल्या नसून त्या काँग्रेस सरकार आल्यावर भरल्या जाणार आहेत. नवीन व्यवसाय सुरू करणाºया युवकांना अनेक नियम शिथिल करणार आहे. जे लोक दुसºयाला रोजगार देतील त्यांना मदत करण्याची भूमिका येणारे काँग्रेस सरकार घेणार आहे.कृषीचं वेगळं बजेटकृषी क्षेत्राबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, साधारणत: वर्षातून एकच बजेट केंद्र सरकार मांडत असे, पण आमचं सरकार आल्यास कृषीसाठी वेगळं बजेट असेल. यामध्ये शेतकºयांना अधिकचे उत्पन्न व आर्थिक मदत यावर निर्णय होतील.... मोदींनी वेगळीच संस्कृती दाखवलीराहुल गांधी म्हणाले, मोदी हे नेहमी धर्म व संस्कृती बदल बोलत असतात. आपल्या संस्कृतीत गुरुला खूप महत्त्व आहे; पण मोदींनी आपले गुरू लालकृष्ण अडवाणी यांनाच उमेदवारी नाकारून वेगळीच संस्कृती दाखवली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक