शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

राहुल आवाडेंचे बंड रात्रीत थंड : राजू शेट्टी यांच्या विजयासाठी झटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 01:04 IST

आमच्या मनातील शंका दूर झाल्याने हातकणंगले मतदारसंघातून मी अर्ज भरणार नाही. महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती

ठळक मुद्देउमेदवारी अर्ज भरणार नाही

कोल्हापूर : आमच्या मनातील शंका दूर झाल्याने हातकणंगले मतदारसंघातून मी अर्ज भरणार नाही. महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांचा मुलगा राहुल आवाडे यांनी सोमवारी (दि. १) हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केल्याने आघाडीत खळबळ उडाली होती. गुरुवारी (दि. २८) दिवसभर आघाडीत यावर उलटसुलट चर्चा झाली. रात्री बारा वाजता खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाश आवाडे यांची बैठक होऊन निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. अवघ्या एका रात्रीत राहुल आवाडेंचे बंड थंड झाले असले तरी दोन्ही कॉँग्रेसच्या पातळीवर त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यासाठी प्रकाश आवाडे यांना शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन बंड शमल्याचे सांगावे लागले.

राहुल म्हणाले, ‘हातकणंगले मतदारसंघात कॉँग्रेस व आवाडे गटाची मोठी ताकद आहे; पण अनवधानाने असेल; काही चुका झाल्याने आवाडे गटाचे तरुण कार्यकर्ते दुखावले होते. त्यातून आपण ‘हातकणंगले’तून उमेदवारी करावी, असा कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने उमेदवारीची घोषणा केली; पण या चुकांमध्ये सुधारणा झाल्याने उमेदवारीचा निर्णय मागे घेतला आहे. आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्यामागे ठाम राहणार आहे.येडेमच्छिंद्रला निमंत्रण नव्हतेखासदार राजू शेट्टी यांच्या प्रचाराचा प्रारंभ येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथून करण्यात आला. कॉँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपणासह कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी निमंत्रित करणे गरजेचे होते; पण त्यांनी आम्हाला बोलवले नाही ही वस्तूस्थिती आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहण्यासाठी शेट्टी यांनी मला फोन केला होता, त्यावेळी आपण मुंबईत होतो, असा खुलासाही प्रकाश आवाडे यांनी केला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांनी हातकणंगले मतदारसंघातून बंडखोरी करण्याची घोषणा गुरुवारी केल्याने खळबळ उडाली होती; पण रात्रीत यू टर्न घेत त्यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याची घोषणा राहुल आवाडे व प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी कॉँग्रेस कमिटीत केली.

टॅग्स :Politicsराजकारणkolar-pcकोलार