शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

गंगा नदी स्वच्छतेसाठी किरणोत्साराचे तंत्रज्ञान

By admin | Updated: January 29, 2016 00:54 IST

आर. भट्टाचार्य : भाभा अणुसंशोधन केंद्राचा प्रस्ताव

कोल्हापूर : किरणोत्सार तंत्रज्ञानाचा वापर आता गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी वापर केला जाणार आहे. केंद्र सरकारला भाभा अणुसंशोधन केंद्रातर्फे याचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती अ‍ॅटोमिक एनर्जी रेग्युलेशन बोर्डाचे उपाध्यक्ष डॉ. आर. भट्टाचार्य यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.डॉ. भट्टाचार्य म्हणाले, नियंत्रित किरणोत्साराचे दैनंदिन जीवनात अनेक लाभ घेत आहोत, विशेषत: अन्न प्रक्रिया उद्योगाला याचा मोठा फायदा झाला आहे. किरणोत्साराच्या विविध घटक वर्गीकरण तंत्रज्ञानाचा वापर करून टप्प्या-टप्प्याने गंगा नदीचे शुद्धिकरण केले जाईल. त्यात किरणोत्सारचा वापर करून प्रदूषित पाण्यातील जीवाणूंना नष्ट केले जाईल. त्यामुळे पाणी शुद्ध होईल शिवाय उर्वरित अन्य घनपदार्थ शेती तसेच अन्य उपयोगांसाठी वापरता येईल. हे तंत्रज्ञान देशातील अन्य नद्यांच्या शुद्धिकरणासाठी देखील उपयुक्त ठरणार आहे. अणुऊर्जा निर्मितीसाठी देशातील युरेनियमची उपलब्धता लक्षात घेऊन संबंधित ऊर्जा निर्मितीसाठी थेरियमचा वापर केला जाईल.आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे संचालक डॉ. एम. राजकुमार म्हणाले, किरणोत्सार आणि नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान हे केवळ रोगनिदानासाठीच नव्हे, तर उपचारासाठी वरदायी ठरले आहे. कर्करोगाच्या विविध प्रकारच्या पेशींना नष्ट करण्यासाठी नॅनो विज्ञानाधारित औषधे महत्त्वाची ठरत आहेत. मानवी मेंदू आणि हृदय यांचे स्नायू पुनर्निर्मितीक्षम नाहीत. मात्र, नॅनो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऊती संवधर्नाद्वारे ही क्षमता निर्माण करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.भाभा अणु संशोधन केंद्राच्या कुंडकुलम एक्स्पर्ट ग्रुपच्या एक्सिलेटर सेफ्टी समितीचे माजी प्रमुख प्रा. एम. आर. अय्यर म्हणाले, केरळच्या अणुऊर्जा प्रकल्पामधील किरणोत्साराची पातळी जास्त आहे. मात्र, या ठिकाणी सर्वेक्षण केले असता या ठिकाणी नागरिकांमध्ये शारीरिक व्यंग आढळलेले नाही; पण काही स्वरूपात गैरसमज पसरविले जातात. कमी पातळीवरील किरणोत्सार वैद्यकीय क्षेत्रात उपयुक्त ठरत आहे. या पत्रकार परिषदेस कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, पदार्थविज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. सी. डी. लोखंडे, आर. जी. सोनकवडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)+अणुऊर्जा निर्मिती सुरक्षितजैतापूर, कर्नाकुलम्मध्ये अणुऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पांबाबत काही लोकांकडून गैरसमज पसरविण्यात येत आहेत. देशातील अणुऊर्जा निर्मिती सुरक्षित आहे. त्याबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे, असे मत डॉ. भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, सध्या देशात ज्या ठिकाणी अणुऊर्जा निर्मितीचे प्रकल्प आहेत. त्यांची सुरक्षिततेच्यादृष्टीने वेळोवेळी तपासणी केली जाते. त्याचा वार्षिक अहवाल आॅनलाईन प्रसिद्ध करण्यात येतो, असेही ते म्हणाले.