शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘राधानगरी’चे दरवाजे खुले

By admin | Updated: August 4, 2016 01:22 IST

पंचगंगा इशारा पातळीकडे : शिवाजी पूल वाहतुकीस बंद

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले असून, ९००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून रात्री इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मच्छिंद्री झाल्यावर पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. पावसाचा जोर असला तरी परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.महाड येथील पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील जपावसाची सुरू असलेली संततधार पाहता नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व परिस्थितीचा दिवसभर आढावा घेऊन संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून पाहणीही केली. त्यानंतर त्यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला.जिल्हाधिकारी सैनी म्हणाले,राधानगरी धरणातून होणारा सध्याचा विसर्ग पाहता रात्रीच (बुधवार) हा पूल वाहतुकीसाठी बंद करून पोलिस बंदोबस्त ठेवला जाईल. हा रस्ता बंद झाल्यावर वाहतूक शियेसह अन्य पर्यायी मार्गांवरून वळविण्यात येणार आहे. दुपारी शिवाजी पूल येथे जाऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, पोलिस अधीक्षक व प्रांताधिकारी यांच्या पथकाने पाहणी केली आहे. पूरपरिस्थितीची शक्यता गृहीत धरून शहरातील पाण्याखाली जाणाऱ्या ठिकाणांची पुन्हा एकदा महापालिका आयुक्तांच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली आहे. पावसाचा जोर वाढत असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्राशेजारी जाऊ नये, पाणी आलेल्या रस्त्यांवरून जाण्याची चूक करू नये, पाण्यात उतरून मोबाईलवरून फोटो व सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नये. ज्या गावात स्थलांतर करण्याची आवश्यकता आहे, त्यानुसार ते करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाचा जोर असला तरी परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. असे असले तरी प्रशासन सर्व बाजूंनी सज्ज आहे.यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे उपस्थित होते.------------------यंत्रणा सज्ज; आठ नवीन बोटीपरिस्थिती नियंत्रणात असली तरी प्रशासन सज्ज आहे. ‘कन्यागत’ सोहळ्यासाठी आठ नवीन बोटी आल्या आहेत. त्यांचा वापर संभाव्य पूरपरिस्थितीसाठी करून घेतला जाणार आहे. सध्या प्रशासनाकडे दहा बोटी आहेत. त्यातील पाच बोटी शिरोळ येथे, दोन जिल्हाधिकारी कार्यालयात, दोन महापालिका व एक गडहिंग्लज नगरपरिषद येथे आहेत. २०० लाईफ जॅकेट्स उपलब्ध आहेत.पाणीपातळी कमी झाल्यावर पुलांची पाहणीमहाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुलांचा विषय ऐरणीवर आला आहे. सद्य:स्थितीला पाणीपातळी वाढल्याने पुलांची स्थिती सखोलपणे पाहणे अशक्य आहे. त्यामुळे पातळी कमी झाल्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत अहवाल येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.