शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

पंचवीस दिवसांत भरले राधानगरी धरण

By admin | Updated: August 3, 2014 01:46 IST

६.६४ टीएमसी पाणीसाठा

राधानगरी : मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या पाणलोट क्षेत्रामुळे केवळ पंचवीस दिवसांत झालेल्या पावसामुळे राधानगरी धरणात ६.६४ टीएमसी पाणीसाठा झाला. या काळात धरणात ५५.७० फूट पाणीपातळी वाढली. याशिवाय वीजनिर्मितीसाठीही पाणी सोडण्यात आले. काल, शुक्रवारी हे धरण पूर्ण भरले. यामुळे यावर अवलंबून असलेल्या गावांची पाण्याची गरज वर्षभर भागणार आहे. यावर्षी केवळ आठ-दहा दिवस किरकोळ हजेरी लावून जून महिन्यात मान्सून कोरडाच गेला. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे भरण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. राधानगरी धरणातील पाण्याचा वापर कोल्हापूर शहरासह इचलकरंजीपर्यंत बहुतांश शेती व पिण्यासाठी होतो. यावर्षी ८ जुलैपर्यंत येथे केवळ ४६८ मिलिमीटर पाऊस झाला होता. यावेळी धरणाची पाणीपातळी २९१.८० फूट व साठा १.९० टीएमसी होता. त्यामुळे या दिवसापासून जलविद्युत निर्मितीसाठी सोडण्यात येणारे पाणीही बंद केले होते. ८ जुलै ते १ आॅगस्टपर्यंत येथे २३७२ मिलिमीटर पाऊस झाला. राधानगरी अभयारण्याचे बहुतांश क्षेत्र या पाणलोट क्षेत्रात येते. दाजीपूर परिसरात इथल्यापेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यामुळे धरणात येणारे पाणी संचय क्षमतेच्या तिप्पट असते. मागील दहा-बारा दिवसांपासून जलविद्युत निर्मितीही सुरू होती. काल सायंकाळी धरणाची पाणीपातळी ३४७.५० फूट झाल्यावर दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. आतापर्यंतच्या साठ वर्षांच्या कालखंडात धरण जुलैअखेर पूर्वीच भरले आहे. गतवर्षी २३ जुलै रोजी धरण भरले होते. यावर्षी पाऊस लांबूनही धरण भरायला नऊ दिवस जास्त लागले.