शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

कोल्हापूर विभागात रब्बीचा पेरा अजून ३४ टक्क्यांवरच-सांगलीची आघाडी, कोल्हापूर सर्वांत कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 11:52 IST

कोल्हापूर : रब्बी पेरणी हंगामाचा उत्तरार्ध सुरू झाला तरी अजून शेताच्या मशागतीचीच कामे सुरू असल्याने प्रत्यक्षात पेरणी होण्यास वेळ ...

ठळक मुद्देमागील वर्षी आजअखेर ४९ टक्के पेरण्या

कोल्हापूर : रब्बी पेरणी हंगामाचा उत्तरार्ध सुरू झाला तरी अजून शेताच्या मशागतीचीच कामे सुरू असल्याने प्रत्यक्षात पेरणी होण्यास वेळ लागत आहे. त्यातच आता वीजजोडण्यांच्या अडथळ्यांमुळेही पेरणीवर मर्यादा येत आहेत. हंगाम पुढे सरकत असल्याने बागायती पट्ट्यात उसाच्या लागणीलाच प्राधान्य दिले जात आहे. या सर्वांचा परिणाम होऊन यंदाचा रब्बीचा पेरा अजूनही ३४ टक्क्यांवरच अडकला आहे. गेल्या वर्षी आजअखेर ४९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. आतापर्यंत सांगलीत सर्वाधिक ३९ टक्के पेरण्या झाल्या असून सातारा दुसऱ्या, तर कोल्हापूर तिसºया क्रमांकावर आहे.

साधारणपणे सप्टेंबरच्या मध्यापासून रब्बी हंगामाची तयारी सुरू होते. आॅक्टोबरमध्ये सर्वाधिक पेरण्या होतात; तर मागास पेरण्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केल्या जातात; पण यावर्षी परतीच्या पावसाने हे चक्रच बदलवून टाकले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धुवाधार पाऊस कोसळत असल्याने पेरणी तर लांबचीच गोष्ट; शेतशिवारात पाऊलही ठेवता येत नव्हते, अशी परिस्थिती होती. या महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून पाऊस थांबल्याने मशागतीच्या कामांना सुरुवात झाली.

हंगामच पुढे सरकल्याने पेरणी करायची की नाही याबाबत स्वत: शेतकरीच साशंक दिसत आहे. पेरणी लांबली तरी पुढे मार्चमधील वादळी पावसात पिके अडकण्याचा धोका आहे. त्यामुळे अंदाज घेऊनच पेरणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे. आडसाल लागणी वाया गेल्याने रिकाम्या पडलेल्या शेतांमध्ये सध्या नव्याने ऊसलागण आटोपण्याची घाई उडाल्याचे चित्र आहे. या लावण क्षेत्रात रब्बीसाठी म्हणून हरभºयासह अन्य कडधान्ये पिकांची पेरणी करण्याकडे कल वाढला आहे.कोल्हापूर विभागात मोडणाºया कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांत आजअखेर केवळ ३४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वाधिक ४५ टक्के पेरणी ज्वारीची झाली आहे. गव्हाच्या पेरणीकडे पाठ फिरविल्याचे दिसत असून केवळ आठ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. मका २३ टक्के, हरभरा १५ टक्के, सूर्यफूल २० टक्के क्षेत्रांवर पेरणी झाल्याचे दिसत आहे.---------------------------------

  • जिल्हा एकूण क्षेत्र पेरक्षेत्र टक्केवारी
  • कोल्हापूर ४०,२९७ ४४४० ११
  • सांगली २५१५०० ९७८२० ३९
  • सातारा १४८२३ ७२०४४ ३४

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना