शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कोल्हापूर विभागात रब्बीचा पेरा अजून ३४ टक्क्यांवरच-सांगलीची आघाडी, कोल्हापूर सर्वांत कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 11:52 IST

कोल्हापूर : रब्बी पेरणी हंगामाचा उत्तरार्ध सुरू झाला तरी अजून शेताच्या मशागतीचीच कामे सुरू असल्याने प्रत्यक्षात पेरणी होण्यास वेळ ...

ठळक मुद्देमागील वर्षी आजअखेर ४९ टक्के पेरण्या

कोल्हापूर : रब्बी पेरणी हंगामाचा उत्तरार्ध सुरू झाला तरी अजून शेताच्या मशागतीचीच कामे सुरू असल्याने प्रत्यक्षात पेरणी होण्यास वेळ लागत आहे. त्यातच आता वीजजोडण्यांच्या अडथळ्यांमुळेही पेरणीवर मर्यादा येत आहेत. हंगाम पुढे सरकत असल्याने बागायती पट्ट्यात उसाच्या लागणीलाच प्राधान्य दिले जात आहे. या सर्वांचा परिणाम होऊन यंदाचा रब्बीचा पेरा अजूनही ३४ टक्क्यांवरच अडकला आहे. गेल्या वर्षी आजअखेर ४९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. आतापर्यंत सांगलीत सर्वाधिक ३९ टक्के पेरण्या झाल्या असून सातारा दुसऱ्या, तर कोल्हापूर तिसºया क्रमांकावर आहे.

साधारणपणे सप्टेंबरच्या मध्यापासून रब्बी हंगामाची तयारी सुरू होते. आॅक्टोबरमध्ये सर्वाधिक पेरण्या होतात; तर मागास पेरण्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केल्या जातात; पण यावर्षी परतीच्या पावसाने हे चक्रच बदलवून टाकले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धुवाधार पाऊस कोसळत असल्याने पेरणी तर लांबचीच गोष्ट; शेतशिवारात पाऊलही ठेवता येत नव्हते, अशी परिस्थिती होती. या महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून पाऊस थांबल्याने मशागतीच्या कामांना सुरुवात झाली.

हंगामच पुढे सरकल्याने पेरणी करायची की नाही याबाबत स्वत: शेतकरीच साशंक दिसत आहे. पेरणी लांबली तरी पुढे मार्चमधील वादळी पावसात पिके अडकण्याचा धोका आहे. त्यामुळे अंदाज घेऊनच पेरणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे. आडसाल लागणी वाया गेल्याने रिकाम्या पडलेल्या शेतांमध्ये सध्या नव्याने ऊसलागण आटोपण्याची घाई उडाल्याचे चित्र आहे. या लावण क्षेत्रात रब्बीसाठी म्हणून हरभºयासह अन्य कडधान्ये पिकांची पेरणी करण्याकडे कल वाढला आहे.कोल्हापूर विभागात मोडणाºया कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांत आजअखेर केवळ ३४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वाधिक ४५ टक्के पेरणी ज्वारीची झाली आहे. गव्हाच्या पेरणीकडे पाठ फिरविल्याचे दिसत असून केवळ आठ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. मका २३ टक्के, हरभरा १५ टक्के, सूर्यफूल २० टक्के क्षेत्रांवर पेरणी झाल्याचे दिसत आहे.---------------------------------

  • जिल्हा एकूण क्षेत्र पेरक्षेत्र टक्केवारी
  • कोल्हापूर ४०,२९७ ४४४० ११
  • सांगली २५१५०० ९७८२० ३९
  • सातारा १४८२३ ७२०४४ ३४

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना