शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागात रब्बीचा पेरा अजून ३४ टक्क्यांवरच-सांगलीची आघाडी, कोल्हापूर सर्वांत कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 11:52 IST

कोल्हापूर : रब्बी पेरणी हंगामाचा उत्तरार्ध सुरू झाला तरी अजून शेताच्या मशागतीचीच कामे सुरू असल्याने प्रत्यक्षात पेरणी होण्यास वेळ ...

ठळक मुद्देमागील वर्षी आजअखेर ४९ टक्के पेरण्या

कोल्हापूर : रब्बी पेरणी हंगामाचा उत्तरार्ध सुरू झाला तरी अजून शेताच्या मशागतीचीच कामे सुरू असल्याने प्रत्यक्षात पेरणी होण्यास वेळ लागत आहे. त्यातच आता वीजजोडण्यांच्या अडथळ्यांमुळेही पेरणीवर मर्यादा येत आहेत. हंगाम पुढे सरकत असल्याने बागायती पट्ट्यात उसाच्या लागणीलाच प्राधान्य दिले जात आहे. या सर्वांचा परिणाम होऊन यंदाचा रब्बीचा पेरा अजूनही ३४ टक्क्यांवरच अडकला आहे. गेल्या वर्षी आजअखेर ४९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. आतापर्यंत सांगलीत सर्वाधिक ३९ टक्के पेरण्या झाल्या असून सातारा दुसऱ्या, तर कोल्हापूर तिसºया क्रमांकावर आहे.

साधारणपणे सप्टेंबरच्या मध्यापासून रब्बी हंगामाची तयारी सुरू होते. आॅक्टोबरमध्ये सर्वाधिक पेरण्या होतात; तर मागास पेरण्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केल्या जातात; पण यावर्षी परतीच्या पावसाने हे चक्रच बदलवून टाकले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धुवाधार पाऊस कोसळत असल्याने पेरणी तर लांबचीच गोष्ट; शेतशिवारात पाऊलही ठेवता येत नव्हते, अशी परिस्थिती होती. या महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून पाऊस थांबल्याने मशागतीच्या कामांना सुरुवात झाली.

हंगामच पुढे सरकल्याने पेरणी करायची की नाही याबाबत स्वत: शेतकरीच साशंक दिसत आहे. पेरणी लांबली तरी पुढे मार्चमधील वादळी पावसात पिके अडकण्याचा धोका आहे. त्यामुळे अंदाज घेऊनच पेरणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे. आडसाल लागणी वाया गेल्याने रिकाम्या पडलेल्या शेतांमध्ये सध्या नव्याने ऊसलागण आटोपण्याची घाई उडाल्याचे चित्र आहे. या लावण क्षेत्रात रब्बीसाठी म्हणून हरभºयासह अन्य कडधान्ये पिकांची पेरणी करण्याकडे कल वाढला आहे.कोल्हापूर विभागात मोडणाºया कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांत आजअखेर केवळ ३४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वाधिक ४५ टक्के पेरणी ज्वारीची झाली आहे. गव्हाच्या पेरणीकडे पाठ फिरविल्याचे दिसत असून केवळ आठ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. मका २३ टक्के, हरभरा १५ टक्के, सूर्यफूल २० टक्के क्षेत्रांवर पेरणी झाल्याचे दिसत आहे.---------------------------------

  • जिल्हा एकूण क्षेत्र पेरक्षेत्र टक्केवारी
  • कोल्हापूर ४०,२९७ ४४४० ११
  • सांगली २५१५०० ९७८२० ३९
  • सातारा १४८२३ ७२०४४ ३४

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना