शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

वस्त्रोद्योगाला ‘ई-वे बिल’चा गुंता : वगळा अथवा पन्नास किलोमीटरपर्यंत सूट द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:28 IST

अतुल आंबी ।इचलकरंजी : वेगवेगळ्या अडचणींतून वाटचाल करणाऱ्या वस्त्रोद्योगाला सध्या २५ मेपासून राज्यांतर्गत लागू झालेल्या ई-वे बिल या आणखीन एका अडचणीतून मार्गक्रमण करावे लागत आहे. वस्त्रोद्योगातील कापूस ते कापड या प्रक्रियेत अनेक ठिकाणी माल उठाठेव करावा लागतो. त्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजेच किमान सातवेळा करावे लागणारे ‘ई-वे बिल’ ही मोठी अडचण ...

ठळक मुद्देस्थानिक ठिकाणी सातवेळा निर्माण करावे लागते बिल

अतुल आंबी ।इचलकरंजी : वेगवेगळ्या अडचणींतून वाटचाल करणाऱ्या वस्त्रोद्योगाला सध्या २५ मेपासून राज्यांतर्गत लागू झालेल्या ई-वे बिल या आणखीन एका अडचणीतून मार्गक्रमण करावे लागत आहे. वस्त्रोद्योगातील कापूस ते कापड या प्रक्रियेत अनेक ठिकाणी माल उठाठेव करावा लागतो. त्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजेच किमान सातवेळा करावे लागणारे ‘ई-वे बिल’ ही मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट शासनाने ई-वे बिलमधून वस्त्रोद्योगाला वगळावे; अन्यथा ५० किलोमीटरपर्यंत सूट द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

शेतीखालोखाल रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग म्हणून वस्त्रोद्योगाकडे पाहिले जाते. देशातील ५५ टक्के वस्त्रोद्योग महाराष्टÑ राज्यात आहेत. त्यामुळे या उद्योगाला चालना देणे व टिकवून ठेवणे, यासाठी शासन स्तरावरून सोयी-सुविधा, सवलती मिळणे गरजेचे आहे. असे असताना गेल्या काही वर्षांपासून या उद्योगात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. नोटाबंदी, जीएसटी, त्यापाठोपाठ आलेली मंदी यामुळे वस्त्रोद्योग मेटाकुटीला आला आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून वस्त्रोद्योगाची वाटचाल जेमतेम पद्धतीने सुरू झाली. तोपर्यंतच आता नव्याने ई-वे बिल ही अडचण निर्माण झाली आहे.

ई-वे बिल तयार करणे ही मालविक्री करणाºयाची जबाबदारी आहे. असे असताना काही सूत व्यापाºयांकडून तांत्रिक अडचणी पुढे करून माल घेणाºया यंत्रमागधारकांनाच ई-वे बिल तयार करण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांच्यात ई-वे बिलवरून गोंधळ उडत आहे, ही एक अडचण. त्यानंतर दुसरी अडचण म्हणजे यंत्रमागधारकाला सूत खरेदी केल्यानंतर पहिल्यांदा वॉर्पिंग-सायझिंगला पाठवावे लागते. त्या टप्प्यावर पहिले ई-वे बिल करावे लागणार. त्यानंतर तयार झालेले बिम कारखानदाराकडे कापड विणण्यासाठी येताना दुसरे ई-वे बिल, खरडसाठी तिसरे, खरड वायडींगला जाताना चौथे, वेफ्टसाठी पाचवे, कापड आणताना सहावे आणि कापड विक्री करताना सातवे असे कापड तयार होईपर्यंतच किमान सातवेळा ई-वे बिल निर्माण करावे लागणार आहे.

सर्वसामान्य यंत्रमागधारकाकडे संगणक व इंटरनेटसारख्या सुविधा नसल्याने त्याला तर ही बाब अशक्यच आहे.या प्रमुख दोन अडचणींमध्ये पहिली अडचण सूत व्यापाºयांनी ई-वे बिल बनवणे कायदेशीररित्या गरजेचे आहे. ई-वे बिलसाठी लागणारी सर्व माहिती त्यांच्याकडेच उपलब्ध असल्यामुळे त्यांनाच ते निर्माण करावे लागेल. मात्र, यामध्ये महत्त्वाची तांत्रिक अडचण म्हणजे यंत्रमागधारकांनी सूत खरेदी करून त्याचे गेटपास/बिल बनवून घेतल्यानंतर तो माल कोणत्या वाहनातून वाहतूक करणार व कोणत्या ठिकाणी जाणार, याबाबत सूत व्यापाºयांना माहित नसते. त्यामुळे ई-वे बिल निर्माण करताना अडचण होते.

ही व्यापाºयांची अडचण आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या काऊंटचे सूत वेगवेगळ्या ठिकाणांहून उचलणे, ते वेगवेगळ्या सायझिंग, वार्पिंग व कारखानदारांना पाठवणे. यामध्ये वाहन निश्चित नसते. तसेच माल उचलण्याचा दिवस व वेळही निश्चित नसते. ही यंत्रमागधारकांची अडचण आहे.

या तांत्रिक अडचणीतून तोडगा काढण्यासाठी गोडावूनमधील डिलिव्हरी घेताना यंत्रमागधारकांनी वाहन नंबर व अन्य आवश्यक माहिती सूत व्यापाºयांना दिल्यास या तांत्रिक अडचणींवर स्थानिक चर्चेतून मार्ग निघेल. मात्र, शासन स्तरावरून निर्माण झालेल्या अडचणींवर शासनानेच मार्ग काढावा लागेल.वस्त्रोद्योगातील प्रत्येक टप्प्यावर ई-वे बिल निर्माण करणे अशक्य असल्याने वस्त्रोद्योगाला ई-वे बिलप्रणालीतून वगळावे; अन्यथा किमान ५० किलोमीटरची सूट द्यावी, अशी मागणी होत आहे.कोणतीही वस्तू विक्रेता विक्री करत असताना त्याचा ई-वे बिल खरेदीदारने निर्माण करावे, ही अशक्य अशी बाब इचलकरंजीतील सूत व्यापारी यंत्रमागधारकावर लादू पाहत आहेत. असे न करता सूत व्यापाºयांनी यंत्रमागधारकांकडून ई-वे बिलसाठी लागणारी आवश्यक व योग्य माहिती घेवून ई-वे बिल स्वत:च निर्माण करावे. तसेच इचलकरंजीतील यंत्रमागधारकांनीही ई-वे बिल स्वत: निर्माण न करता ते सूत व्यापाºयांकडूनच करून घ्यावे.- विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटनाई-वे बिल निर्माण करण्याची पहिली जबाबदारी ही विक्रेत्याची आहे. त्याने नाहीच केले, तर खरेदीदारही निर्माण करू शकतो. त्यानंतर तिसरी जबाबदारी वाहतूकदार (ट्रान्स्पोर्ट) ची आहे. त्यांच्याकडे ई-वे बिल नसल्यास दंडात्मक कारवाई व माल जप्त होवू शकतो. तसेच कमीत कमी दहा हजार रुपये दंड व टॅक्सच्या १०० टक्के पेनल्टी अशी कारवाई होवू शकते. यामध्ये तिन्हीही घटकांचे नुकसान आहे. त्यामुळे व्यापारी, यंत्रमागधारक यांनी चर्चेतून योग्य मार्ग निवडावा.- उमेश शर्मा, सी. ए., औरंगाबादवस्त्रोद्योगातील स्थानिक टप्प्यांवरील उठाठेव पाहता तमिळनाडू राज्याने पूर्ण वस्त्रोद्योगाला ई-वे बिल प्रक्रियेतून वगळले आहे. तर गुजरातमध्ये शहरांतर्गत वाहतुकीसाठी वस्त्रोद्योगाला सूट देण्यात आली आहे. या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही निर्णय घ्यावा, अशीही मागणी आहे.