शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

साखर कारखान्यांचे प्रश्न चंद्रकांतदादांनी सोडवावेत

By admin | Updated: January 16, 2015 00:25 IST

हसन मुश्रीफ : घोरपडे कारखान्याचा पहिला गळीत हंगाम

कागल : सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रामाणिक आहेत. शेतकरी आणि साखर कारखाने यांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र, त्यांनी मंत्रिमंडळाच्या समोर हे विषय आग्रहीपणे मांडण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.कागल येथील निवासस्थानी संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाबद्दल ते पत्रकारांशी बोलत होते. ‘एफआरपी’च्या मुद्द्यावर ते म्हणाले की, शेतकरी आणि साखर कारखाने या दोघांनाही न्याय देण्याची भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने घेतली पाहिजे. चंद्रकांतदादा पाटील यांनी याबद्दल काही घोषणा केल्या. आपली भूमिकाही स्पष्टपणे मांडली आहे. ते स्वत: प्रामाणिकपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, मंत्री म्हणून ते नवखे आहेत. सरळमार्गी आहेत. त्यांनी केलेल्या घोषणा निव्वळ घोषणा राहणार नाहीत, याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी या संदर्भात केलेल्या घोषणेचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ‘खंडन’ केले. म्हणून निव्वळ घोषणा करण्यापेक्षा मंत्रिमंडळात निर्णय घ्यावा. साखर कारखानदारीत सर्वच राजकीय पक्षांचे नेते कमी-जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे या प्रश्नावर राजकारण करून साखर उद्योग अडचणीत आणू नये. कारण साखर उद्योग अडचणीत आला तर पर्यायाने शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. (प्रतिनिधी)