येथील अरिहंत कंपनी गेली काही वर्षे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला कंत्राटी कर्मचारी पुरवित होती. परंतु सावर्जनिक आरोग्य विभागाने असे कर्मचारी पुरवण्यासाठी राज्यासाठी एकच यशस्वी कंपनी नेमली आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना ३१ ऑगस्ट २१ रोजी कार्यमुक्त करण्यात आले. म्हणून अरिहंतने उच्च न्यायालयात धाव घेतली.
त्यावर सोमवारी सुनावणी सुरू असताना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा परिषद वकील यांच्या मांडणीमध्ये फरक असल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आणि बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता आज या प्रश्नी सुनावणी होणार आहे.