शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

साळगाव येथील रस्त्याचा प्रश्न ४३ वर्षांनंतर संपुष्टात

By admin | Updated: February 10, 2015 23:53 IST

२००३ मध्ये हिरण्यकेशी नदीला पूर आल्यानंतर मात्र झोपड्यांच्या जागी प्रत्येकी शंभर चौरस मीटर जागेत पक्की घरे बांधण्यात आली.

आजरा : साळगाव (ता. आजरा) येथील भूमिहीनांच्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न गेली दोन वर्षे ऐरणीवर होता. मंगळवारी तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रत्यक्ष मोजणी करून सदर प्रश्न निकालात काढल्याने गेली ४३ वर्षे भूमिहीनांना असणारा रस्ता खुला झाला आहे.साळगाव येथील भूमिहीन बबन यशवंत वड्ड, अर्जुन महादेव सूर्यवंशी, मोहन रामचंद्र कांबळे, सोनाबाई सुतार व दयानंद पांडुरंग रामाने यांना १९७२ मध्ये तत्कालीन तहसीलदारांनी ६.५ गुंठे जमीन घरबांधणीसाठी दिली होती. गट नं. २८/१ मधील या जागेचे मूळ मालक नेऊंगरे हे होते. २८/२ गट नं. नेऊंगरे यांच्याकडेच आहे. जागावाटप करताना प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या १३० चौ.मी. जागेपैकी १०० चौ.मी. जागा घरासाठी व ३० चौ. मी. जागा वहिवाटीसाठी ठेवण्याबाबतची शर्त घालण्यात आली होती. याप्रमाणे संबंधितांना जागा वाटप झाले. येथे झोपड्यावजा घरे बांधून ही मंडळी राहू लागली. २००३ मध्ये हिरण्यकेशी नदीला पूर आल्यानंतर मात्र झोपड्यांच्या जागी प्रत्येकी शंभर चौरस मीटर जागेत पक्की घरे बांधण्यात आली. उर्वरित ३० चौ. मी. जागा सोयीप्रमाणे सोडल्याने वहिवाटीच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला.प्रश्न दिवसेंदिवस चिघळतच चालला होता. अखेर मंगळवारी तहसीलदारांनी स्वत: यामध्ये लक्ष घालत प्रत्यक्ष मोजणी घातली. अतिक्रमणे काढण्याची सूचना केली आणि रस्ता मिळवून दिला. यावेळी निवासी तहसीलदार डी. डी. कोळी, बबन शिंदे, भूमी अभिलेखचे पठाण, मुक्ती संघर्षचे कॉ. संग्राम सावंत उपस्थित होते. (प्रतिनिधी)