शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्यातील भूखंडाचा प्रश्न मार्गी लावणार

By admin | Updated: August 26, 2015 00:29 IST

चंद्रकांत पाटील : कोल्हापुरात शिष्टमंडळाशी चर्चा; मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन

आष्टा : आष्टा शहरातील दत्त वसाहत, गांधीनगर, साईनगर या गट क्रमांक ४, ६, ९ मधील सुमारे सातशे भूखंडधारकांचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.आष्टा (ता. वाळवा) येथील शिवसेनेचे माजी तालुका उपप्रमुख वीर कुदळे, डॉ. सतीश बापट, डॉ. दत्ताजीराव माने, भाजपचेभालचंद्र कुलकर्णी, मारुती माने, शहानवाज मुजावर यांनी कोल्हापूर येथे मंत्री पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की, गट क्रमांक ४, ६, ९ मधील खरेदी-विक्री व्यवहार प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद असून या शेतजमिनी १९३0 मध्ये सरकारने काढलेल्या लिलावात बाळासाहेब आप्पासाहेब काळे (पांडुरंग कृष्णा माने), सुभेदार हारुनखान कादरखान व भीमराव बाळासाहेब पाटील यांनी विकत घेतल्या होत्या. या प्लॉटधारकांची नावे सात-बारा सदरी नोंद आहेत. मात्र प्रांताधिकारी इस्लामपूर यांनी सात वर्षांपूर्वी शर्तभंग करुन प्लॉट खरेदी, विक्री झाल्यामुळे गट क्रमांक ४, ६, ९ मधील सर्व खातेदारांना खरेदी-विक्री व्यवहारास बंदी घातली आहे. सात-बारा उताऱ्यावर भूधारणा पध्दती क्रमांक २ नुसार नोंदी घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र शासन नियमानुसार आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकदा बिगरशेती आदेश झाल्यानंतर तीन वर्षांनंतर रिव्हिजनला घेता येत नाही. जमिनीचे ७00 उपविभाग सर्टिफाय नोंदणी झालेले आहे. याप्रमाणे कायदा हायकोर्ट, सुप्रिम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अशा जमिनीबाबत कोणतीही दंडात्मक कारवाई करता येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी शिष्टमंडळास दिले. (वार्ताहर)]जयंतरावांनी न सोडविलेला प्रश्न चंद्रकांतदादा सोडवतील?माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी मंत्री असताना अनेक बैठक घेऊनही येथील भूखंडाचा प्रश्न सुटला नाही. म्हणून येथील नागरिकांनी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भूखंडाच्या प्रश्नाबद्दल बाजू मांडली आहे. चंद्रकांतदादा यांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, जयंत पाटील यांनी न सोडविलेला प्रश्न चंद्रकांतदादा सोडवतील का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.