शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

अंशकालीन पदवीधर कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार

By admin | Updated: September 17, 2015 23:47 IST

मुख्यमंत्र्यांसोबत ३० ला बैठक : राज्यात १३ हजार ६६२ कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला

कोल्हापूर : शासन सेवेत विनाअट थेट नियुक्तीच्या मागणीसाठी गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ लढा देणाऱ्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना आता न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने यासाठी दोन प्रस्ताव तयार केले असून, या कर्मचाऱ्यांना एक तर दहा हजार ठोक मानधन अथवा त्यांना थेट नियुक्ती देऊन त्यांच्यासाठी २६ हजार कोटी रुपयांची तरतूदही केली जाणार आहे. त्यामुळे हा प्रश्न येत्या ३० सप्टेंबरला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सुटण्याची चिन्हे आहेत. गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ राज्यातील १३ हजार ६६२ अंशकालीन कर्मचारी हे पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून शासनाच्या महसूल, जिल्हा परिषद, प्रादेशिक परिवहन, आदी कार्यालयांत थेट नियुक्ती मिळावी म्हणून लढा देत आहेत. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्यावेळी तीन वर्षांसाठी ठरावीक मानधनावर केली होती. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना पुढे कायम करावे, अशी मागणी संघटनेने शासनाकडे केली होती. मात्र, शासनाने वेळोवेळी या कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित ठेवत त्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. गेल्या वर्षीपासून पुन्हा संघटनेने उचल खाल्ली आणि पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला. १३ आॅगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर या कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा ३० दिवसांचे आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना या कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेण्यास सांगितले होते. आमदार विनायक मेटे यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे हे आंदोलन मागे घेतले होते.आता अंतिम टप्प्यातील बोलणी ३० सप्टेंबरला सह्याद्री अतिथिगृहावर आयोजित केली आहे. यासाठी शासनानेही या कर्मचाऱ्यांसमोर ठोक मानधन स्वरूपात कायमस्वरूपी दहा हजार रुपये पगार किंवा थेट नियुक्ती देऊन २६ हजार कोटी रुपयांची तरतूदही केल्याचे समजते. त्यामुळे हा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (प्रतिनिधी)कोल्हापुरातील ३६५ अंशकालीन कर्मचारी यामध्ये समाविष्ट आहेत. मुळात ७०० हून अधिक अंशकालीन कर्मचारी होते. व्हेरिफिकेशनमध्ये केवळ ३६५ जणच पुढे आले. त्यामुळे आता कोल्हापुरातील या ३६५ कर्मचाऱ्यांना थेट नियुक्ती मिळू शकते. यासाठी कोल्हापुरातूनही शिवाजी निरुके, पी. डी. पाटील, संजय काटकर, रवींद्र पोवार, आदी कार्यरत आहेत. राज्यातील अंशकालीन कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत. ३० सप्टेंबरला सह्याद्री अतिथिगृहावर दुपारी तीन वाजता आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलाविले आहे. त्यात हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.- रणजित चव्हाण, राज्य कार्याध्यक्ष,पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना