शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणीबाणी’वर हवी नियोजनाची ‘मात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 23:57 IST

इचलकरंजी शहराला धग : ‘कृष्णा’ऐवजी ‘वारणे’वर अवलंबून राहावे लागणार

इचलकरंजी : उन्हाळ्याच्या वाढलेल्या झळांबरोबरच इचलकरंजीकरांना पाणी टंचाईची धग लागत आहे. कोयना धरणातील साठा शासनाने आणीबाणीसाठी आरक्षित ठेवला आहे. इचलकरंजीसह कृष्णा काठावरील दोन्ही बाजूंच्या जनतेला आता वारणा धरणातील पाणी साठ्यावर अवलंबून राहावे लागणार असल्याचे ‘सत्य’ उघड झाले आहे. त्यामुळे साडेतीन लाख इचलकरंजीवासीयांसाठी येत्या तीन महिन्यांसाठी योग्य नियोजन आणि त्याच्या काटेकोर अंमलबजावणीची गरज निर्माण झाली आहे.जानेवारीपासून पाणी प्रदूषणामुळे पंचगंगेतील पाण्याचा उपसा बंद करावा लागतो. त्यामुळे कृष्णा नदीतील पाण्याशिवाय अन्य उपाय राहात नाही. अशी वस्तुस्थिती असताना इचलकरंजीत गेले आठवडाभर झालेल्या पाणी-बाणीच्या काळात नगरपालिकेसमोर कोणतेही नियोजन नव्हते, ही बाब उघडकीस आली. पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ, नगरसेवक विठ्ठल चोपडे, जलअभियंता ए. एन. जकीनकर यांनी धावपळ केल्याने वास्तव समजले.सुरूवातीला चार-पाच दिवस आमदार सुरेश हाळवणकर यांच्यामार्फत झोळ, चोपडे, जकीनकर आणि मुख्याधिकारी यांनी पाटबंधारे खात्यास जाग आणण्याचा प्रयत्न केला. चांदोली (वारणा) धरणातून सोडलेले पाणी इचलकरंजीसाठी मजरेवाडी (ता. शिरोळ) येथे पोहोचू द्या, म्हणून दूरध्वनी केले. मात्र, पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना फक्त झुलवत ठेवले. अखेर आमदार हाळवणकर यांनी जिल्हाधिकारी अमित सैनी यांना पाणी टंचाईची कल्पना दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनाही सांगण्यात आले आणि पाटबंधारे खात्याची चक्रे हालली.म्हैशाळ बंधाऱ्यात अडविलेले पाणी १२०० क्युसेकप्रमाणे उत्सर्ग करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून मंगळवारी रात्री राजापूर बंधाऱ्यात पर्यायाने मजरेवाडी येथे पाण्याचा साठा झाला आणि बुधवारपासून इचलकरंजीत अंशत: का होईना, नळ पाणीपुरवठा सुरू झाला. गेल्या आठवडाभराच्या पाणी टंचाईच्या काळात स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था आणि त्यांचे दुर्लक्ष, काहींनी टॅँकर भागात नेण्यासाठी केलेली अरेरावी, कूपनलिकांतील पाण्याची परिस्थिती अशा सर्व गोष्टी आता लक्षात आल्या असून, प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी त्यापासून बोध घ्यावा आणि येत्या तीन महिन्यांतील पाणी टंचाईवर मात करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)