शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

मुरगूडमधील रोडरोमिओंना वठणीवर आणा

By admin | Updated: July 29, 2016 00:28 IST

पालक, मुलींची मागणी : नेहमीचाच त्रास; पोलिसांबरोबर सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा

अनिल पाटील -- मुरगूड -कॉलेज, शाळा सुरू झाल्यामुळे मुरगूड एस. टी. स्टॅँड ते महाविद्यालय मार्गावर रोडरोडरोमिओंनी उच्छाद मांडला आहे. या रोडरोमिओंना वठणीवर आणण्याची मागणी मुलींसह पालक करीत आहेत. केवळ वृत्तपत्रात बातमी आली की कारवाईचा फार्स करणाऱ्या पोलिसांकडून अपेक्षाभंग झाल्याने शहरातील सेवाभावी संस्थांनी यामध्ये पुढाकार घेऊन हा प्रश्न कायमचा मिटविण्याचची गरज आहे.मुरगूड शहरात तीन महाविद्यालये, चार हायस्कूल, आय. टी. आय., यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र शिवाय संगणक प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था, यामुळे परिसरातील पन्नासहून अधिक खेड्यांतील हजारो विद्यार्थिंनी दररोज येतात. एस. टी. स्टँडपासून ते महाविद्यालयापर्यंत या सर्वांनाच चालत जावे लागते. त्यामुळे सकाळी सात ते आठ, तसेच साडेदहा ते दुपारी एकपर्यंत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत रोडरोमिओ या विद्यार्थिनींना त्रास देण्याचा प्रयत्न करतात.मुलींच्या मागे मागे जाणे, गाडीवरून वेगाने अश्लील हावभाव करणे, मोबाईलवर फोटो काढणे, इतकेच काय एस.टी.मध्ये जाऊन छेडछाड करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. या रोडरोमिओंची परिसरामध्ये दहशत असल्याने आणि ग्रुप करून ते फिरत असल्याने त्यांच्या विरोधात कोणीच तक्रार करण्यास धजावत नाही; पण सर्वसामान्य नागरिक आणि पालकांतून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुदाळ तिट्टा आणि बिद्री परिसरातील या रोमिओंनी उच्छाद मांडला आहे. यांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांबरोबर सेवाभावी संस्थांनी पुढकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नगरपलिकेने व एस.टी. प्रशासनाने संयुक्तपणे स्टॅँड परिसरात जर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविले, तर स्टॅँडवर घुटमळणाऱ्या रोमिओंची संख्या निश्चितच कमी होईल. तसेच शैक्षणिक संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र सक्तीचे करून शाळा, महाविद्यालयाच्या आवारात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे परिसरातील दंगामस्ती करण्याऱ्यांवर नक्कीच आळा बसणार आहे. मुरगूड पोलिसांन गर्दीच्या वेळी पेट्रोलिंग करून छेडछाड करणाऱ्या रोमिओंवर कडक कारवाई करावी लागणार आहे. तसेच कॉलेज सुटण्याच्या वेळी स्टॅँड परिसरात पोलिसांची उपस्थिती गरजेची आहे.मुलींचा शाळाबाह्य प्रवेश रोखलामुलींच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असल्याने शाळेतील शिक्षकांनी कंबर कसली आहे. शहरातील एका शाळेने पालकांच्या मागणीनुसार मुली शाळेमध्ये एकदा आल्या की शाळा सुटल्यानंतरच त्यांना शाळेच्या आवाराच्या बाहेर सोडले जाते. कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर सोडले जात नाही.. या उपक्रमाचेही परिसरातून कौतुक होत आहे.