शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

निवडणुकीत भाजपला मुळासकट उपटून टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 01:07 IST

म्हासुर्ली : गेली अनेक वर्षे रखडलेल्या धामणी प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ धामणी खोऱ्यातील अनेक गावांतील नागरिकांचा रविवारी धुंदवडे (ता. ...

म्हासुर्ली : गेली अनेक वर्षे रखडलेल्या धामणी प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ धामणी खोऱ्यातील अनेक गावांतील नागरिकांचा रविवारी धुंदवडे (ता. गगनबावडा) येथे जनआक्रोश मेळावा झाला. यावेळी हजारो शेतकºयांनी घोषणाबाजी आणि मनोगताद्वारे सरकारचा निषेध करून आपल्या एकीची वज्रमूठ कायम राखण्याची शपथ घेऊन आगामी निवडणुकांवर बहिष्काराचा ठाम निर्धार व्यक्त केला.धामणी खोरे विकास कृती समितीच्या माध्यमातून हा जनआक्रोश मेळावा झाला. या मेळाव्यात हजारोंच्या समुदायाने प्रचंड घोषणाबाजी केली. येथील गावागावांतील निवडणुकांवर बहिष्काराचे ठराव धामणी विकास कृती समिती व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आले असून, हजारो शेतकºयांच्या स्वाक्षºयांचे निवेदन मुख्यमंत्री, राज्यपाल, निवडणूक आयोग यांच्यासह जिल्हाधिकाºयांना देण्यात येणार आहे.पाणी पाणी म्हणत अनेक पिढ्या संपल्या; पण पाणी काही आलेच नाही. रखरखलेले जीवन आणि खुरटलेले संसार घेऊन जगणाºया धामणीवासीयांच्या भावनांचा बांध अखेर फुटला आहे. पाण्याच्या प्रतीक्षेत अर्धेअधिक आयुष्य सरले. निदान आमच्या पोराबाळांच्या जीवनाचा तरी उद्घार होईल का? मायबाप सरकारचं इतके निष्ठूर का झाले असावे, अशाअनेक प्रश्नांची सरबत्ती करत शासनाप्रती धुंदवडे येथे जनतेने आक्रोश केला. यावेळी परिसरातील हजारो नागरिकउपस्थित होते.तब्बल १८ वर्षे धामणी प्रकल्प रखडल्याने येथील पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शासनाच्या प्रचंड बेफिकिरीमुळे या खोºयातील शेतकºयांना पाणी पाणी करावे लागत आहे. पावसाळयात अतिवृष्टी, तर उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना अशा दुहेरी संकटात या खोºयातील शेतकरी सापडला असून, शेती व्यवसाय आतबट्टयाचा झाला आहे.सन २००० मध्ये ३.८५ टीएमसी साठवण क्षमतेच्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली. दोन तीन वर्षे चाललेले काम वगळता आजवर हा प्रकल्प रखडलेलाच आहे. दोन वर्षांपूर्वी प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही निविदा निघाली नसल्याने प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. अनेकदा आंदोलने करूनही येथील लोकांच्या न्याय मागणीला शासनाने केराची टोपलीच दाखविली. त्यामुळे ६० गावांतील जनतेने धामणी धरणाचे काम चालू होत नाही, तोपर्यंत पुढील सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे.‘लोकमत’मधील लेखाची चर्चा‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी रविवारच्या अंकात ‘जागर’ या सदरामध्ये लिहिलेल्या ‘निवडणुकांवर बहिष्कार हा पर्याय आहे का?’ या लेखाची चर्चा धुंदवडे येथे मेळाव्यात सुरू होती. अनेकांनी या लेखाचे कौतुक केले. वक्त्यांनी आपल्या भाषणात हा लेख अभ्यासपूर्ण असल्याचे सांगितले. धामणीवासीयांच्या पाठीशी नेहमी राहिल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार मानले.