शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

महापौरांच्या खुर्चीला आघाडीमुळे धक्का

By admin | Updated: May 1, 2017 00:07 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीचे मनोमीलन : इच्छुकांकडून पुन्हा मोर्चेबांधणी; नेत्यांसमोरील बहुमताची चिंता दूर

शीतल पाटील ल्ल सांगलीमहापालिकेच्या चार प्रभाग समिती सभापती निवडीच्या निमित्ताने सत्ताधारी काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले. आता वर्षभर दोन्ही काँग्रेसकडून हातात हात घालून कारभार केला जाणार आहे. या नव्या आघाडीमुळे महापौर हारूण शिकलगार यांच्या राजीनाम्याला बळ मिळणार आहे. काँग्रेस नेत्यांसमोरील संख्याबळाची चिंताही काही प्रमाणात दूर होणार आहे. त्यामुळे महापौरविरोधक त्यांच्या राजीनाम्यासाठी आणखी आक्रमक होऊ शकतात. मात्र राजीनाम्याच्या खेळात ‘मिरज पॅटर्न’ निर्णायक भूमिका बजावू शकतो. महापालिकेच्या प्रभाग सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीसाठी आघाडी केली. दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी काही दिवसांपूर्वीच आगामी पालिका निवडणुकीत आघाडीचे संकेत दिले होते. त्याची सुरूवात प्रभाग २२ च्या पोटनिवडणुकीपासून झाली होती. काँग्रेसने ही पोटनिवडणूक बिनविरोध करून एक पाऊल पुढे टाकले. त्याची परतफेड करीत राष्ट्रवादीने प्रभाग समितीच्या निवडी बिनविरोध करण्यास मदत केली. अपवाद केवळ मिरजेतील प्रभाग चारचा! पालिकेच्या चारही प्रभाग समित्यांची निवडणूक राष्ट्रवादीने लढविली असती, तर किमान दोन प्रभाग समित्यावर त्यांचे वर्चस्व राहिले असते. तरीही राष्ट्रवादीने तीन प्रभाग समित्या काँग्रेससाठी सोडल्या. केवळ एका प्रभाग सभापती पदावर समाधान मानले. पण निवडीच्या राजकारणात प्रभाग चारचे सभापतीपद राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या शुभांगी देवमाने यांना मिळाले. पण त्यामागे मिरज पॅटर्नचा हात होता. शिवाय राष्ट्रवादीने, देवमाने हे काँग्रेसचे सभापती आहेत, असे जाहीर करून मिरज पॅटर्नच्या तिरक्या चालीचे पाप काँग्रेसच्या पदरात टाकले आहे. प्रभाग समित्यांसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्याने गेल्या दोन वर्षापासून महापालिकेत अल्पमतात असलेल्या काँग्रेसला चांगलाच हात मिळाला आहे. दोन वर्षापासून काँग्रेसअंतर्गत गटबाजी उफाळून आली. मदनभाऊ गट आणि उपमहापौर गट अशी दोन शकले झाली. उपमहापौर गटात काँग्रेसचे आठ ते दहा नगरसेवक होते. त्यामुळे बहुमतातील सत्ताधारी अल्पमतात गेले. उपमहापौर गटाने विरोधाची भूमिका घेतल्याने काँग्रेस अडचणीत आली होती. त्यात वर्षभरापासून तर काँग्रेस बँकफूटवरच होती. संख्याबळ नसल्याने पालिकेचा गाडा हाकण्यात अडचणी येत होत्या. त्यात वर्षभराने होणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला भाजपचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. भाजपच्या तोडीस तोड विकासकामेही करावी लागणार आहेत. पण आता ही चिंता काही प्रमाणात मिटली आहे. गेल्या चार महिन्यापासून काँग्रेसमध्ये महापौर बदलाचे वारे वाहू लागले आहे. महापौर हारूण शिकलगार यांना दहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्याची मुदत संपली तरी, अल्पमतामुळे काँग्रेस नेत्यांनी महापौर बदलाचा विषय बाजूला ठेवला होता. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आ. डॉ. पतंगराव कदम व जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत महापौरांच्या राजीनाम्याचा विषय गाजला. डॉ. कदम यांनी नगरसेवकांची गोळाबेरीज झाल्यास पदाधिकारी बदलण्याची हमी दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पालिकेतील आघाडीमुळे आता महापौर हारुण शिकलगार यांच्या राजीनाम्याच्या मागणीला अधिक बळ मिळाले आहे. सत्ताधारी गटाला धसका : मिरज पॅटर्नचामहापालिका निवडणुकीच्या वर्षभर आधी मिरज पॅटर्न डोके वर काढत असतो. आताही त्याची सुरूवात झाली आहे. इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी, मैनुद्दीन बागवान अशा मिरजेतील नगरसेवकांनी उणीदुणी विसरून पुन्हा एकत्रित मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसमधील नायकवडी व आवटी गटाने गटनेते किशोर जामदार यांच्याविरूद्ध आघाडी उघडली आहे. जामदार यांना पदावरून हटविण्याची मागणी काँग्रेस नेत्यांसमोर केली होती. पण सांगलीच्या नगरसेवकांनी जामदारांना पाठिंबा देत, नायकवडी, आवटींचा डाव उधळून लावला. परिणामी मिरजेच्या राजकारणात जामदार एकटे पडले आहेत. त्यामुळे महापौरांचा राजीनामा व त्यानंतर नव्या निवडीत मिरज पॅटर्नची भूमिका निर्णायक राहू शकते. बहुमताचे गणित...काँग्रेसकडे ३० ते ३२ नगरसेवक आहेत, तर राष्ट्रवादीकडे १७ नगरसेवक आहेत. यात मिरज पॅटर्नच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या नगरसेवकांना वगळले तरी, काँग्रेस बहुमताच्या जवळपास जाऊ शकते. उर्वरित विरोधक असलेल्या स्वाभिमानी आघाडी, उपमहापौर गटातही फाटाफूट असल्याने त्याचा फायदा उठवित महापौर बदल करता येईल, असे गणित मांडण्यास, महापौर पदासाठी इच्छुक असलेल्यांनी सुरूवात केली आहे. इच्छुकांची नावे चर्चेतमहापौर पदासाठी काँग्रेसकडून राजेश नाईक, रोहिणी पाटील, सुरेश आवटी यांची नावे चर्चेत आहे. त्यात आवटी हे मिरज पॅटर्नमध्ये सामील आहेत. त्यात त्यांना अपात्र ठरविले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने अद्याप ते नगरसेवक पदावर कायम आहेत. पण त्यांच्या निवडीत तांत्रिक व कायदेशीर बाबींची अडचण आहे. राजेश नाईक हे ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी स्थायी समितीच्या सभापती पदावर काम केले आहे, तर रोहिणी पाटील या पहिल्यांदाच नगरसेवक झाल्या आहेत. पण त्यांच्यामागे नानासाहेब महाडिक घराण्याचा राजकीय वारसा आहे. महिला सदस्यांत त्या लोकप्रिय आहेत.