शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

आयुर्वेदाचे प्रयोजन

By admin | Updated: January 7, 2017 01:08 IST

आयुर्वेदाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, त्याने काही मूलभूत सिद्धांत दिले आहेत. ते वापरून तुम्ही नवीन रोगांवरही उपचार करू शकता.

आजज चर्चेला सर्वजण हजर होते. आयुर्वेद शिकणारे अनेक विद्यार्थी शंका समाधानासाठी येत. आजपासून त्यांनी एकत्रितपणेच चर्चेला बसायचे ठरविले.सर्वजण आलेले पाहून बिपिनने प्रश्न केला की, ‘सर, आज जगात सर्वत्र आयुर्वेदाचे वारे वाहू लागले आहेत; पण आज इतकी वर्षे ‘आयुर्वेद’ भारतातच का राहिला? त्याचा प्रसार का झाला नाही? आयुर्वेदाचे मूळ तत्त्व काय?जशी ज्ञानेश्वरी लिहिताना ज्ञानेश्वरांनी स्वत:ची परंपरा साक्षात शंकराकडून सुरू होते, असे सांगितले. तसेच आयुर्वेदाची परंपरा ही ब्रह्मदेवापासून सुरू होते. तिथून पुढे प्रज्ञापती-अश्विनीकुमार-इंद्र अशी ती आली आहे. सुरुवातीला या पृथ्वीवर फारशी रोगराई नसावी. त्यामुळे लोकांना औषधांची गरज पडली नाही. पुढे इथे रोगराई सुरू झाल्यावर ऋषींना ते बरे करण्याची आवश्यकता भासू लागली. म्हणून त्यांनी पुनर्वसू आत्रेयांना आपला नेता बनवून हे ज्ञान प्राप्त केले. (यावरून त्याकाळी ज्ञानार्जनासाठी देश सोडून जाण्याची पद्धत असावी.) पुढे अग्निवेश, आदी ऋषींनी आत्रेयांपासून ज्ञान प्राप्त करून आपापले ग्रंथ लिहिले. आज काळाच्या ओघात परकीय आक्रमणांनी त्यातील अनेक ग्रंथ नष्ट झाले.प्रत्येक गोष्टीला पुढे जाण्यासाठी दोन गोष्टींची जरुरी असते. एक लोकाश्रय दुसरा राजाश्रय. हे पुरेसे मिळाले तरच एखादी कला, शास्त्र पुढे जाऊ शकते. परकियांच्या राजवटीत हे अशक्य असते.आयुर्वेद हा इतर शास्त्रांपेक्षा फार वेगळा आहे. त्यांचे वैशिष्ट्य जर कशात असेल, तर ते रोगांचा विचार करण्यात. रोग झाल्यावर बरे करण्यासाठी अनेक औषधोपचार पद्धती आहेत; पण कसे वागल्यावर रोग होणारच नाहीत किंवा झाले तरी त्याचे परिणाम तीव्र होणार नाहीत, असे सांगणारे ‘आयुर्वेद’ हे बहुधा जगातील पहिले आणि एकमेव शास्त्र आहे. वाहतुकीचे जसे नियम असतात आणि जर ते पाळले तर अपघात कमी होतात, तसेच इथे आहे. आरोग्याचे काही नियम आहेत आणि ते पाळले तर आजारपणांची संख्या निश्चितच कमी होते.आता आपल्याला दिवसभर कसे वागायचे हे जसे माहीत पाहिजे. तसे ऋतुमान बदलत असताना काय करायला हवे, हे ही माहीत पाहिजे. सरळ रस्त्यावर असणारा गाडीचा वेग आपण वळण झाल्यावर कमी करतो. नाहीतर अपघात होईल, हे माहीत असते. तसेच ऋतुमानाप्रमाणे दिनचर्या बदलायला हवी, हे ही माहीत हवे. नाहीतर आजारपण ठरलेलेच !आजकाल अनेकांना प्रश्न पडतो की, आम्हाला काही होत नाही, मग आम्हाला औषध कशाला? आपले शरीर, मन इतके संवेदनशील नसते की प्रत्येक पुढे होणाऱ्या आजारांची कल्पना आपणास आधी येत नाही; परंतु एखादा आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य सर्वांगीण परीक्षा करून बऱ्याचवेळा पुढे होणाऱ्या आजारांची कल्पना रुग्णाला देऊ शकतो, अशाप्रकारे जे रुग्ण नाहीत, त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि जे आजारी पडलेत त्यांना चिकित्सा (औषधोपचार) देऊन बरे करणे, अशी दुहेरी भूमिका आयुर्वेद निभावत असतो.आयुर्वेदाच्या बाबतीत अनेकांना आणखी एक शंका येते ती म्हणजे, आजकाल दिसणारे रोग आयुर्वेदात कुठे वर्णन केले आहेत? आयुर्वेदाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, त्याने काही मूलभूत सिद्धांत दिले आहेत. ते वापरून तुम्ही नवीन रोगांवरही उपचार करू शकता. ते कसे, ते आपल्या पुढच्या चर्चेत कळेलच. उद्या पुन्हा नवीन शंका घेऊन मुले येतील. तोपर्यंत आजची चर्चा इथेच थांबवू.---- - डॉ. विवेक हळदवणेकर(डॉ. विवेक हळदवणेकर हे प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ आहेत)