शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

गुन्हेगारांच्या शिक्षेचे प्रमाण वाढले : दयाळ

By admin | Updated: November 22, 2014 00:04 IST

‘जवखेड’चा तपास योग्य दिशेने : शेतकऱ्यांवरील खटले मागे घेण्यासंदर्भात शासन आदेश नाही

कोल्हापूर : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी पोलीस दल सक्षमपणे भूमिका बजावत आहे. गेल्या तीन वर्षांत या गुन्हेगारांच्या शिक्षेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०११ ला गुन्हेगारांचा शिक्षेच्या प्रमाणाचा आलेख ८.२ टक्के इतका होता. तो आता १५.४ झाला आहे. त्याचे कारण म्हणजे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्यरीत्या केलेला तपास होय, अशी माहिती आज, शुक्रवारी कोल्हापूर येथे राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी दिली.पोलीस महासंचालक दयाळ कोल्हापुरात एका खटल्यासंदर्भात साक्ष देण्यासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आले होते. न्यायालयातील कामकाज आटोपल्यानंतर ताराबाई पार्क येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.जवखेड (जि. नगर) येथील दलित हत्याकांड प्रकरणाचा तपास करताना कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत, अशा पद्धतीने, अतिशय सावध गतीने पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्याचबरोबर पोलीस दलाची आणखी प्रशिक्षण केंद्रे उभारली पाहिजेत. त्यामध्ये प्रामुख्याने मूलभूत सुविधा असल्या पाहिजेत. राज्यातील शेतकरी आंदोलनातील खटले मागे घेण्याचा शासन आदेश आलेला नाही; त्यामुळे ते कधी मागे घेतले जातील हे सांगू शकत नाही, असेही दयाळ यांनी सांगितले. ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी राज्यातील गुन्हेगारी, पोलीस दलातील सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलाविली होती. त्यामध्ये पोलीस दलाचे मूलभूत प्रश्न, तसेच पोलीस दल आणखी सक्षम करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याबाबत चर्चा झाली. (प्रतिनिधी)