शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात पिकांच्या पंचनाम्याला आजपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:24 IST

आजरा : गेल्या आठवड्यात झालेली अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे आजरा तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे ...

आजरा : गेल्या आठवड्यात झालेली अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे आजरा तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे व पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी बुधवारी दिले. उद्या (गुरूवार, दि. २९)पासून नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याला सुरुवात होणार आहे. कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांची संयुक्त समिती पंचनामे करून अहवाल सादर करणार आहे.

कृषी विभागाच्या अंदाजानुसार, ६०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात यामध्ये निश्चित वाढ होणार आहे. तालुक्यात दि. २२, २३ व २४ जुलै दरम्यान उच्चांकी पाऊस झाला आहे. या पावसाने ओढे-नाले व नद्यांचे पाणी शेतजमिनीत घुसून पिकांचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीचे पाणी शेतात घुसल्याने पिके वाहून जाणे, शेतातील बांध वाहून जाणे, अनेक पिकांवर दगड-गोटे, माती-वाळू यांचा थर तयार झाला आहे. पावसानंतर ऊस व भातपिके पिवळी पडली आहेत. काही ठिकाणी पिकांवर किडीचा प्रादुर्भावही झाला आहे. मुसळधार पावसाने घरांची पडझड होऊन अंदाजे ४५ लाखांच्या दरम्यान नुकसान झाले आहे.

आजरा तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पिकांच्या, घरांच्या पडझडीच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक गावात जाऊन कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन माहिती घेणार आहेत.

ग्रामसेवक संबंधित शेतकरी हा त्याच गावचा आहे, तलाठी संबंधित शेतकऱ्याचे जमिनीचे क्षेत्र सांगणार आहेत आणि कृषी सहाय्यक संबंधित शेतकऱ्याच्या किती क्षेत्राचे पुरामुळे नुकसान झाले आहे, त्याची टक्केवारी अहवालामध्ये नमूद करणार आहेत. पिकांच्या नुकसानाचे पंचनामे आठ दिवसांत तयार करून त्याचा अहवाल आजरा तहसीलदारांना दिला जाणार आहे.

चौकट :

स्थलांतरित कुटुंब घरी परतली

गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. सर्व बंधाऱ्यांवरील पाणी कमी झाले असून, पूरपरिस्थिती आटोक्यात आली आहे. तालुक्यातील ८८ कुटुंबांमधील ३६० नागरिक पुरामुळे स्थलांतरित झाले होते. या स्थलांतरित नागरिकांनी पुराचे पाणी कमी झाल्याने मंगळवारी आपली घरे स्वच्छ केली आहेत. स्थलांतरित कुटुंब बुधवारी आपापल्या घरी परतली आहेत.