शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

आजऱ्यात पिकांच्या पंचनाम्याला आजपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:24 IST

आजरा : गेल्या आठवड्यात झालेली अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे आजरा तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे ...

आजरा : गेल्या आठवड्यात झालेली अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे आजरा तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे व पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी बुधवारी दिले. उद्या (गुरूवार, दि. २९)पासून नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याला सुरुवात होणार आहे. कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांची संयुक्त समिती पंचनामे करून अहवाल सादर करणार आहे.

कृषी विभागाच्या अंदाजानुसार, ६०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात यामध्ये निश्चित वाढ होणार आहे. तालुक्यात दि. २२, २३ व २४ जुलै दरम्यान उच्चांकी पाऊस झाला आहे. या पावसाने ओढे-नाले व नद्यांचे पाणी शेतजमिनीत घुसून पिकांचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीचे पाणी शेतात घुसल्याने पिके वाहून जाणे, शेतातील बांध वाहून जाणे, अनेक पिकांवर दगड-गोटे, माती-वाळू यांचा थर तयार झाला आहे. पावसानंतर ऊस व भातपिके पिवळी पडली आहेत. काही ठिकाणी पिकांवर किडीचा प्रादुर्भावही झाला आहे. मुसळधार पावसाने घरांची पडझड होऊन अंदाजे ४५ लाखांच्या दरम्यान नुकसान झाले आहे.

आजरा तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पिकांच्या, घरांच्या पडझडीच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक गावात जाऊन कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन माहिती घेणार आहेत.

ग्रामसेवक संबंधित शेतकरी हा त्याच गावचा आहे, तलाठी संबंधित शेतकऱ्याचे जमिनीचे क्षेत्र सांगणार आहेत आणि कृषी सहाय्यक संबंधित शेतकऱ्याच्या किती क्षेत्राचे पुरामुळे नुकसान झाले आहे, त्याची टक्केवारी अहवालामध्ये नमूद करणार आहेत. पिकांच्या नुकसानाचे पंचनामे आठ दिवसांत तयार करून त्याचा अहवाल आजरा तहसीलदारांना दिला जाणार आहे.

चौकट :

स्थलांतरित कुटुंब घरी परतली

गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. सर्व बंधाऱ्यांवरील पाणी कमी झाले असून, पूरपरिस्थिती आटोक्यात आली आहे. तालुक्यातील ८८ कुटुंबांमधील ३६० नागरिक पुरामुळे स्थलांतरित झाले होते. या स्थलांतरित नागरिकांनी पुराचे पाणी कमी झाल्याने मंगळवारी आपली घरे स्वच्छ केली आहेत. स्थलांतरित कुटुंब बुधवारी आपापल्या घरी परतली आहेत.