शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

अहंकार चढलेल्यांना खाली खेचा

By admin | Updated: October 9, 2014 00:18 IST

स्मृती इराणी : राज्यात महिला असुरक्षित असल्याचीही टीका

कोल्हापूर : प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षांचा वनवास भोगला. महाराष्ट्राच्या जनतेने कॉँग्रेस-राष्ट्रवादी राजवटीत पंधरा वर्षे वनवास भोगला. म्हणूनच अहंकाराची परिसीमा गाठलेल्या या राजवटीला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज, बुधवारी येथे केले. ज्या राज्यात महिला पोलीस सुरक्षित राहू शकल्या नाहीत, तेथे सर्वसामान्य महिला तरी कशा सुरक्षित राहू शकतील? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक व कोल्हापूर उत्तरचे उमेदवार महेश जाधव यांच्या प्रचारार्थ संभाजीनगरातील पटांगणावर आयोजित केलेल्या सभेत स्मृती इराणी बोलत होत्या. ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर कॉँग्रेस, राष्ट्रवादीने सत्ता मिळविली, त्या शेतकऱ्यांवर त्यांनी लाठीहल्ले केले, गोळीबार केला. राज्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; पण त्यांना कोणतीही मदत केली नाही. उलट पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी अपमानित केले. अशा अहंकार चढलेल्यांना घरात बसवायची वेळ आली आहे, असे इराणी म्हणाल्या. इराणी यांनी कोल्हापूर शहराला पर्यटनाचा दर्जा का दिला नाही, राज्यातील जनतेला चोवीस तास वीज का दिली नाही, गरीब कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा का प्रयत्न केला नाही, असे सवाल उपस्थित केले. अरुंधती महाडिक म्हणाल्या, महाडिक निवडणुकीस उभारतात काहींना पक्षनिष्ठा आठवते; परंतु पक्षात असूनही तुम्ही विरोध करता त्यावेळी तुमची पक्षनिष्ठा कोठे जाते? धनंजय महाडिक निवडून गेल्यानंतर त्यांनी चांगली कामे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, परंतु चांगल्या कामांसाठी राज्य सरकारची एनओसी देण्यात आमचे मंत्री आडवे पडले, असा आरोपही त्यांनी केला.यावेळी आमदार संजय पाटील, महेश जाधव, अमल महाडिक, राजेंद्र ठाकूर, शैलजा पाटील यांची भाषणे झाली. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, राजलक्ष्मी खानविलकर, रामभाऊ चव्हाण, आदी उपस्थित होते. तुमचे कसलेच श्रेय नाहीधनंजय महाडिक यांना खासदारपदी निवडून आणण्यात मंत्र्यांचे श्रेय आहे असा दावा केला जातो; पण असा दावा कोणी करू नये. महाडिक स्वत:च्या ताकदीवर व कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेच्या जिवावर निवडून आले आहेत, असा दावाही अरुंधती महाडिक यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर महाडिकांवर गुंडगिरीची टीका केली जाते, पण ती खोटी आहे. आम्ही घरंदाज असून, घरात तसेच समाजातही स्त्रियांचा सन्मान करण्याची महाडिक कुटुंबीयांची परंपरा असल्याचे त्या म्हणाल्या.