शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

महापुरात पाठ फिरविणाऱ्या सरकारला खाली खेचा : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:47 IST

कोल्हापूर : सरकारच्या बेफिकीरपणामुळेच महापूर आला; पण संकटकाळात मदत करण्याऐवजी त्यांनी जनतेला वाºयावर सोडले. जमिनीवर न उतरता हेलिकॉप्टरमधून हवाई ...

कोल्हापूर : सरकारच्या बेफिकीरपणामुळेच महापूर आला; पण संकटकाळात मदत करण्याऐवजी त्यांनी जनतेला वाºयावर सोडले. जमिनीवर न उतरता हेलिकॉप्टरमधून हवाई पाहणी केली, बोटीतून पिकनिकला आल्यासारखे सेल्फी काढून पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले, अशा असंवेदनशील आणि मस्तवाल सरकारला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी कोल्हापुरात केले. महाजनादेश यात्रा घेऊन कोल्हापुरात आलेले मुख्यमंत्री महापूरकाळात कुठे होते, असा सवालही त्यांनी केला.वंचित आघाडीच्या नागपूरपासून सुरू झालेल्या सत्तासंपादन यात्रेचा समारोप बुधवारी सायंकाळी कोल्हापुरात दसरा चौकात झाला. निर्धार सभेत भर पावसात भिजतच आघाडीच्या महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ फुटला. स्वबळावर जागा निवडून आणण्यासाठी २८८ किलोंचा हार अर्पण केला गेला.आंबेडकर म्हणाले, संकटकाळात मदतीची सरकारची जबाबदारी होती; पण तीदेखील त्यांनी नीट पार पाडली नाही. पूरग्रस्तांना आपुलकी दाखवली नाही. धरणातील पाण्याच्या विसर्गाचे नियोजन केले नाही.व्यासपीठावर अण्णाराव पाटील, नवनाथ पडळकर, अ‍ॅड. शिवानंद हैबतपुरे, प्रा.यशपाल ंिभंगे, अरुणा माळी, इंद्रजित कांबळे, जीवन पाटील, यशवंत भिगे, अनिल म्हमाने, अस्लम सय्यद आदी मान्यवर नेते उपस्थित होते. अनिल म्हमाने यांनी स्वागत केलेजीवन पाटील वंचितमध्येराष्ट्रवादीचे आकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सदस्य जीवन पाटील यांनी वंचित आघाडीत प्रवेश केला. पावसातच कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसूनच पाटील यांचे जल्लोषात सभास्थळी आगमन झाले. त्यांचे निळा फेटा बांधून स्वागत करण्यात आले.सध्याचे भाजपचे सरकार आजवरचे सर्वांत मोठे चोर आहे. विरोधी पक्ष लंगडा झाला आहे, स्वत:च्या पायावर उभे राहायचे म्हटले तर त्यांना तुरुंगाची भीती दाखविली जात आहे. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा सगळा मामला सुरू आहे. सरकारच्या सर्वच कामांत भ्रष्टाचार वाढला आहे. बेरोजगारी वाढली, कामगारांच्या हातांना काम राहिले नाही, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हे सरकार शेतकरी गोरगरिबांचे नसून दलाल आणि भांडवलदारांचे आहे, असाघणाघाती आरोप आंबेडकर यांनी केला.