शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जनता बझारमुळे मनपाचे सव्वा कोटीचे नुकसान

By admin | Updated: January 22, 2016 00:54 IST

चुकीची घरफाळा आकारणी : संभाजी जाधव यांची कारवाईची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्युमर्स स्टोअर्स (जनता बझार)च्या भाडेकराराची तीस वर्षांची मुदत संपल्यानंतर दोन वर्षांपूर्वी नवीन तीस वर्षे मुदतीचा भाडेकरार केला आहे. मात्र, गेल्या २१ महिन्यांत जनता बझारने पावणेदोन कोटी थकबाकी भरली नाही. बझारच्या तीन इमारतींचा व्यावसायिक दराप्रमाणे घरफाळा न आकारल्याने महापालिकेस सुमारे १ कोटी १४ लाख ६७ हजार ५४६ रुपये नुकसान झाले आहे. या नुकसानीस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. जाधव म्हणाले, जनता बझार यांनी १९७९ ते २००९ दरम्यान तीस वर्षे मुदतीने स्थायी समितीच्या मंजुरीप्रमाणे भाड्याने दिलेली मुदत दि. १६ आॅक्टोबर २००९ रोजी संपली त्यानंतर १ मार्च २०१४ रोजी तीस वर्षे मुदतीचा करार केला; पण पहिल्या कराराची मुदत संपल्यानंतर दि. १६ आॅक्टोबर २००९ ते १ मार्च २०१४ पर्यंत कोणतीही मंजुरी व मुदतवाढ न घेता जनता बझारने जागेचा वापर केला. जर वेळीच मुदतवाढ घेतली असती तर भाडेवाढ करुन महापालिकेचा आर्थिक फायदा झाला असता; पण पाच वर्षांचे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सन २०१४ मध्ये महापालिकेच्या राजारामपुरी येथील इमारतीचे भाडे ५,३२,९२४ रुपये, रुईकर कॉलनी येथील इमारत भाडे ७० हजार रुपये, ए वॉर्ड वरुणतीर्थ येथील इमारत १,४६,६६० रुपये दरमहा भाडेतत्त्वावर दिली आहे. या तिन्हीही इमारतींचे २९ डिसेंबर २०१५ अखेर १ कोटी ७४ लाख २९ हजार २९८ रुपये इतकी थकबाकी भरलेली नाही. महानगरपालिका व जनता बझार यांच्यातील करारानुसार भाडे दरमहा १० तारखेला देणे आवश्यक आहे. तसे न दिल्यास दर शेकडा १५ टक्के दराने व्याजासह भाडे देण्याची जबाबदारी भाडेकरूंनी स्वीकारली होती. यामुळे करारात त्यातूनही दोन महिन्यांपेक्षा जास्त भाडे देण्याचे राहिल्यास संबंधित मिळकत परत महापालिकेच्या कब्जात देण्याचे किंवा महापालिकेस तिचा कब्जा घेण्याचा अधिकार राहील, असे म्हटले आहे. तरीही जनता बझारकडून कोट्यवधींच्या रकमेची थकबाकी असताना या मिळकती महापालिकेने ताब्यात घेतलेल्या नाहीत.रुईकर कॉलनी, बागल मार्केट, वरुणतीर्थ वेश येथील इमारतींना व्यापारी दराप्रमाणे भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी केलेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेस १ कोटी १४ लाख, ६७ हजार ५४६ रुपये नुकसान झालेले आहे. जनता बझारने कराराचा भंग केल्याने तो रद्द होऊन तत्काळ या सर्व इमारती महापालिकेने ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी आपण आयुक्तांकडे करणार असल्याचेही विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)करारातील तरतुदीनुसार या इमारतीमध्ये पोटकूळ ठेवता येत नाही. मात्र, बागल मार्केट (राजारामपुरी) मधील इमारतीत पिझ्झा हट व आदित्य बिर्ला गु्रप हे पोटकूळ ठेवले आहे. जनता बझारमधील पिझ्झा हट या दुकानात २० रुपयांची बिसलेरी बाटली ४० रुपये दराने विकली जात आहे. त्यामुळे निव्वळ फायदा मिळविण्याच्या दृष्टीने या कंपन्यांची पोटकुळे ठेवली आहेत.