शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

लोककलावंतांचे दर्शन ग्रामीण भागात दुर्मीळ

By admin | Updated: October 27, 2014 23:43 IST

कला विस्मृतीत : नवीन पिढीचा नकार

पुनवत : ग्रामीण भागात सुगीच्या दिवसात येऊन लोकांची करमणूक करुन वर्षाकाठीचा आपल्या हक्काचा धान्याचा वाटा मागणारे लोककलावंत काळाच्या ओघात आता दुर्मीळ झाल्यामुळे ग्रामीण गाववाड्यातील आनंद हरवत चालला आहे. सतत बदलत जाणारी सामाजिक स्थिती व नव्या पिढीचा आधुनिक दृष्टिकोन, यामुळेच लोककलावंतांची कला लोप पावत चालली आहे.ग्रामीण भागात पूर्वीचे सुगीचे दिवस किती मजेदार असायचे. गावा-गावात निघणारी खळी, खळ्यावर धान्याच्या राशी, दिवसभर दमून-भागून पिकांची काढणी, मळणी करणारे शेतकरी, सायंकाळी केली जाणारी मळणी, मळणीत चालणारा पैरा व दुसऱ्या दिवशी दारावर किंवा खळ्यावर हमखास टपकणारा एखादा लोककलावंत, हे चित्र आता विस्मृतीत जाऊ लागले आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी किंवा लोकजागृतीसाठी नंदीवाला, कडकलक्ष्मी, मदारी, दरवेशी, गारुडी, पोतराज, बहुरुपी, वासुदेव, डोंबारी, कोंबड्याचा खेळ करणारा गोपाळ, हलगीवाला, वाघ्यामुरळी, पिंगळा जोशी, कुडमुडे जोशी, ज्योतिषी, नवनाथ जोगती, गोंधळी असे एक ना अनेक कलावंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन लोकांची करमणूक करुन आपल्या हक्काचा धान्याचा वाटा मागायचे. लोकांना आशीर्वाद देत पुढच्या वर्षी नक्की येण्याचे आश्वासन देऊन आपल्या गावाकडे वळायचे. काळाच्या ओघात ग्रामीण भागातील हे चित्र आता मागे पडले आहे. खवरेवाडी (ता. शिराळा) येथे एकट्याच आलेल्या, कोंबड्याचा खेळ करणाऱ्या गोपाळाला सहज विचारले, ‘‘दादा, एकटाच आलास, तुझा कोंबडा (मुलगा) कुठाय?’’ त्यावर तो सफाईदारपणे म्हणाला, ‘‘साहेब, कोंबडा आता मोठा झालाय. नवीन पिढीत हे काम करायला कोण तयार न्हाय. म्हणून एकटाच आलो.’’कलावंतांच्या समाजातही आधुनिकतेचे वारे घुसल्याने त्यांची नवीन पिढीतील मुलं नोकरी, धंद्याकडे वळाल्याने, लोककलावंतांचं येणं दुर्मीळ झाले आहे. ग्रामीण समाजजीवनातील लोककलावंतांची कला काळाच्या पडद्याआड जाऊ लागली आहे. (वार्ताहर)