शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आजरा शहरात ११ मेपर्यंत जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST

आजरा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजरा नगर पंचायतीने दिनांक ४ ते ११ मे अखेर जनता कर्फ्यू लागू करण्याचा ...

आजरा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजरा नगर पंचायतीने दिनांक ४ ते ११ मे अखेर जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात दवाखाने व मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आजरा शहरासह ग्रामीण भागात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व आजरा शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू लावणे गरजेचे होते. याविषयी सोमवारी नगर पंचायतीमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील सर्व व्यवहार दिनांक ४ ते ११ मे अखेर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवार (१२) मे पासून आजरा शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहतील.

या बैठकीला उपनगराध्यक्ष विलास नाईक, नगरसेवक अशोक चराटी, संभाजी पाटील, अनिरुद्ध केसरकर, किरण कांबळे, सिकंदर दरवाजकर, अभिषेक शिंपी, रेश्मा सोनेखान यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

जनता कर्फ्यूच्या निर्णयावर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्हाला न विचारता जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला कसा? जनता कर्फ्यू लावण्यापूर्वी दोन दिवस अगोदर आम्हाला का कल्पना दिली नाही? यासह अन्य प्रश्नांचा भडीमार केला. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व दिवाकर नलवडे, जनार्दन टोपले यांनी केले.

आजरा परिसरातील नागरिक आजरा शहरात खरेदीसाठी येत असतात. परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. आजरा शहर सुरक्षित ठेवायचे असेल तर जनता कर्फ्यूशिवाय पर्याय नाही, त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी याला पाठिंबा देत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

भाजीपाला व्यापाऱ्यांची यामुळे मोठी अडचण झाली. दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवलेल्या व्यवहारात अनेकांनी मिळेल त्या किमतीला आपल्या वस्तूंची विक्री केली.

दुकान उघडल्यास ५ हजार दंड

जनता कर्फ्यूच्या काळात सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून घरी सुरक्षित राहायचे आहे. एखाद्या दुकानदाराने दुकानातील वस्तूंची विक्री सुरू केल्यास त्याला ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी-पाटील यांनी दिली.