शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

पंधरा दिवस शहरास अपुरा पाणीपुरवठा

By admin | Updated: May 13, 2015 00:48 IST

पाणी जपून वापरण्याचे आवाहन : बालिंगा उपसा केंद्रातील पंप बदलण्याचे काम सुरू

कोल्हापूर : बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील पाणी उपसा करणारी यंत्रणा बदलण्याचे काम महापालिकेने मंगळवारपासून हाती घेतले आहे. हे काम पूर्ण होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने शहरातील ए, बी, सी, डी वॉर्ड व त्यास संलग्नित ग्रामीण भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन शहर पाणीपुरवठा विभागाने पत्रकाद्वारे केले आहे.बालिंगा येथील उपसा केंद्रातील यंत्रणेत वारंवार बिघाड होत आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणेचे नूतनीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एक-एक करीत सर्व यंत्रणा बदलण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ए, बी, सी, डी वॉर्डांतील अनेक भागांत अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मंगळवारपासून यंत्रणा बदलण्याच्या कामास सुरुवात झाली. हे काम पूर्ण होण्यास किमान १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. या नूतनीकरण कामाचा आपटेनगर परिसर, सानेगुरुजी वसाहत, रिंग रोड संलग्नित परिसर, रायगड कॉलनी, शिवाजी पेठ व मंगळवार पेठ परिसर, देवकर पाणंद, रंकाळा व गंगावेश परिसर, पापाची तिकटी, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर, बिंदू चौक व लक्ष्मीपुरी परिसर, फुलेवाडी व लक्षतीर्थ वसाहत, आदींसह ए, बी, सी व डी वॉर्डांसह ई वॉर्डातील शाहूपुरीच्या काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. शहरवासीयांसाठी दररोज महापालिका शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रांतून १२० दशलक्ष लिटर्स पाण्याचा उपसा करते. बालिंगा उपसा केंद्रात काम सुरू असले तरी इतर दोन केंद्रांतून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा केला जाणार आहे. नागरिकांना पाणी कमी पडू नये, याची खबरदारी घेतल्याचे प्रशासनाने पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)सर्व यंत्रणेचे नूतनीकरणए, बी, सी, डी वॉर्ड व त्यास संलग्नित ग्रामीण भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार बालिंगा येथील उपसा केंद्रातील यंत्रणेत वारंवार बिघाड होत आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणेचे नूतनीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हे काम पूर्ण होण्यास किमान १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे.