शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:18 IST

सेनापती कापशी : गारपिटीमुळे अर्जुनवाडा, नंद्याळ, मुगळी, करड्याळ, जैन्याळ व हळदी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तहसीलदारांनी सात ...

सेनापती कापशी : गारपिटीमुळे अर्जुनवाडा, नंद्याळ, मुगळी, करड्याळ, जैन्याळ व हळदी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तहसीलदारांनी सात दिवसांत या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे सादर करावेत, असे आदेश देत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

चिकोत्रा खोऱ्यात गारपिटीने नुकसान झालेल्या अर्जुनवाडा, मुगळी, करड्याळ, नंद्याळ येथे शेतातील पिकांची ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, शशिकांत खोत, सरपंच प्रदीप पाटील, सरपंच राजश्री पाटील, मंडल अधिकारी एम. के. कुंभार, विशाल कुंभार, सागर पाटील आदींसह शेतकरी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

गारपिटीने ऊसपिकाचे न भरून येणारे असे नुकसान झाले आहे. याचबरोबर शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेल्या कलिंगड, कोबी, बावची, दोडका, भेंडी, मक्का, मिरची आदी भाजीपाला संपूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. शेतकरी प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तसेच अर्जुनवाडा येथे धनगरबांधवांची काही लहान बकरीही गारपिटीने मरण पावली आहेत. त्यांनाही आपत्ती व्यवस्थापनातून आर्थिक मदत मिळवून देऊ, असेही मंत्री मुश्रीफ यावेळी म्हणाले.

फोटो :२८ नंद्याळ पाहणी

ग्रामविकास हसन मुश्रीफ यांनी चिकोत्रा खोऱ्यात गारपिटीने नुकसान झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकूरे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, माजी पं. स. सदस्य शशिकांत खोत, सरपंच प्रदीप पाटील, सागर पाटील, सरपंच राजश्री पाटील, विशाल कुंभार आदींसह शेतकरी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.