शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

महापूर नुकसानभरपाई आणि शेतकरी अनुदान तातडीने द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कागल : महापुरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई व दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेले प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कागल : महापुरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई व दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेले प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यासाठी महाविकास आघाडीचे शासन कोणता मुहूर्त बघत आहे? असा प्रश्न भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून विचारला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, अशी घोषणा केली होती. कर्जमाफी योजनेत प्रामाणिक शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आम्ही आवाज उठवला होता. त्यानंतर शासनाने या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र, अद्याप त्याचाही पत्ता नाही. कोरोना व महापूर अशा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी व नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. आजघडीस बहुतांशी पंचनामे पूर्ण झाले आहेत. महापुरात झालेल्या नुकसानाची भरपाई तसेच प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना ताबडतोब द्यावे. अन्यथा शेतकरी व नागरिकांच्या फार मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल. हे लोक आपल्या न्याय मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.