शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

रक्तदाब असलेल्या नागरिकांना आरोग्य सेवा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:28 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात १०० लोकसंख्येमागे २५ व्यक्ती या उच्च रक्तदाब असल्याचे आढळून आले असून त्याअनुषंगाने शहरातील नागरिकांचे स्क्रीनिंग ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात १०० लोकसंख्येमागे २५ व्यक्ती या उच्च रक्तदाब असल्याचे आढळून आले असून त्याअनुषंगाने शहरातील नागरिकांचे स्क्रीनिंग करून उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना महापालिकेच्या वतीने आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.

सध्याच्या धावपळीच्या युगात मानसिक ताणतणाव, अनियमित आहार, जंक फूड तसेच व्यायामाच्या अभावामुळे नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शंभर व्यक्तींमागे २५ व्यक्तींना रक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. म्हणून अशा व्यक्तींचा शोध घेऊन रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचा उपक्रम महापालिका आरोग्य विभागातर्फे हाती घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विभागांतर्गत भारतीय उच्चदाब नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्स, एएनएम यांना बुधवारी प्रशिक्षण देण्यात आले.

शासनाच्या आदेशाने व प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या सूचनेनुसार प्रशिक्षण आयोजित केले होते. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. समीर नवल व संतोष ननवरे यांनी प्रशिक्षण दिले. यामध्ये ऑनलाइन ॲप्लिकेशन कसे भरायचे. रुग्णाला ३० दिवसांची औषधे दिल्यानंतर त्याच्या गोळ्या संपल्यावर रुग्ण पुढील औषधे घेण्यासाठी आला नाही तर त्याला या सॉप्टवेअरद्वारे कसे अलर्ट केले जाणार याचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाचा प्रारंभ उपायुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा उपस्थित होते.

प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात नागरिकांची पडताळणी करून उच्च रक्तदाब आढळणाऱ्या रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. उच्च रक्तदाब आढळलेल्या रुग्णांची केंद्रात नोंदणी करून त्यांना उपचार कार्ड देण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रांतील नागरिकांनी आपल्या नजीकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधून आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.