शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

माणगावमधील नियोजित स्मारकास निधीची तरतूद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:22 IST

कोल्हापूर : माणगाव (ता. हातकणंगले) येथे ऐतिहासिक समता परिषदेच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू असलेली कामे निधीअभावी खोळंबली आहेत. चार वर्षांपूर्वीच्या ...

कोल्हापूर : माणगाव (ता. हातकणंगले) येथे ऐतिहासिक समता परिषदेच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू असलेली कामे निधीअभावी खोळंबली आहेत. चार वर्षांपूर्वीच्या मंजूर आराखड्यातील १६९ कोटींची रक्कम देऊन या कामांना वेग द्यावा, अशी मागणी माणगाव समता परिषद समितीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलमध्ये भेट घेऊन केली. समता परिषदेचे संयोजक अनिल कांबळे व सम्राट गाेंधळी यांनी निवेदन देऊन अर्थसंकल्पात तरतूद करण्याची विनंती केली.

राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटीचा आणि सामाजिक क्रांतीचा साक्षीदार असलेल्या माणगावचा पर्यटन व ऐतिहासिकदृष्ट्या विकास करण्यासाठी म्हणून शताब्दी वर्ष डोळ्यासमोर आराखडा निश्चित केला. तत्कालीन जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्या सूचनेनुसार १६९ कोटींचा आराखडा तयार करून त्याप्रमाणे कामांना सुरुवात झाली. २ कोटी ३८ लाखांच्या सुरुवातीच्या टप्प्यात आलेल्या निधीतून लंडन भवनची प्रतिकृती, स्वागत कमान, ऑडिटोरियम, ऐतिहासिक भेटीच्या इमारतीचे नूतनीकरण, अशी कामे करण्यात आली. त्यानंतर कोरोनामुळे निधी शासनाकडून थांबवण्यात आला. गेले वर्षभर ही कामे थांबली आहे, शिवाय शताब्दी सोहळाही रद्द करण्यात आला.

विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात बौद्ध समाजाने दिलेेल्या साडेचार एकर जागेत विविध कामे होणार होती. यात अतिग्रे तलावाजवळ सांची स्तुपाच्या धर्तीवर कमान, माणगावमधील तलावावर संविधानाची प्रतिकृती, शाहू महाराज व आंबेडकर यांच्या भेटीचा साेहळा दर्शवणारे दीडशे फूट उंचीचे पुतळे, ग्रंथालय, वस्तुसंग्रहालय, खुले सभागृह, बौद्ध केंद्र अशी विविध विकासकामे होणार होती, पण निधीच नसल्याने त्यांचा नारळच फुटू शकलेला नाही. हा निधी या अर्थसंकल्पात विशेष बाब म्हणून मंजूर करून दिल्यासदुसऱ्या टप्प्यातील कामांना गती येेणार आहे, हे अनिल कांबळे यांनी निदर्शनास आणून दिले. यावर मंत्री मुश्रीफ यांनी अर्थमंत्री व उपमुख्यमंंत्री अजित पवार यांना या बाबतीत सांगण्याची ग्वाही दिली.

फोटो: ०७०३२०२१-कोल-माणगाव

फोटो ओळ: माणगाव समता परिषद समितीचे अनिल कांबळे, सम्राट गाेंधळी यांच्यासह शिष्टमंडळाने रविवारी कागलमध्ये जाऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे माणगाव स्मारकासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली.