शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राणेंवर टीका करण्यापूर्वी स्वत:ची पात्रता सिद्ध करा

By admin | Updated: August 8, 2014 00:40 IST

सतीश सावंत : दीपक केसरकर यांना लगावला टोला

कणकवली : स्वत:च्या स्वार्थासाठी दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नारायण राणे यांच्यापेक्षा दहापटीने विकास करणार असल्याची वल्गना ते करीत आहेत. मात्र, राणेंवर विनाकारण टीका करण्यापूर्वी त्यांनी प्रथम आपली पात्रता सिद्ध करावी आणि त्यानंतरच टीका करावी, असा टोला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे. येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत, नगरसेवक अण्णा कोदे उपस्थित होते. सतीश सावंत म्हणाले, आपल्यासोबत १० हजार कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार अशा वल्गना दीपक केसरकर करीत होते. मात्र, उद्धव ठाकरे सावंतवाडी येणार असल्यामुळे मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी भागातील शिवसैनिकच या प्रवेशावेळी उपस्थित होते. त्यामुळे किती लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला हा खरे तर संशोधनाचा विषय आहे. राष्ट्रवादीत असताना त्यांच्या पक्षाचे अर्थमंत्री तसेच बांधकाममंत्री असूनही दीपक केसरकर आपल्या विधानसभा मतदारसंघाचा विकास करू शकले नाहीत. आंबोली घाटाचा प्रश्न अजूनही रेंगाळत पडलेला आहे. राष्ट्रवादीने मंत्रीपद न दिल्याच्या नैराश्यातून तसेच माजी आमदार शिवराम दळवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानेच केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शैलेश परब हे इच्छुक होते. त्यांची मुंबई येथे केसरकर यांनी भेट घेतली आहे. शिवसेना प्रवेशामागे केसरकर यांचा स्वार्थ नसेल तर शैलेश परब यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणणार का? हे जाहीर करावे. सतीश सावंत यांची आपल्यावर टीका करण्याची पात्रता नाही असे म्हणणाऱ्या केसरकर यांनी नारायण राणेंवर बोलण्याची आपली पात्रता आहे का? हे प्रथम सिद्ध करावे आणि त्यानंतरच राणेंवर टीका करावी. दहशतवादावर बोलण्याचा केसरकरांना काहीही अधिकार नाही. १९९२ मध्ये आर. बी. दळवी यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करताना दोडामार्गसह इतर भागातील चार महिला जिल्हा परिषद सदस्यांना किडनॅप करण्यात आले होते. या प्रकरणाचे सूत्रधार केसरकर हेच होते. तेरा वर्षांपूर्वी सावंतवाडीत एका डॉक्टरचा खून झाला होता. त्यावेळी केसरकर मूग गिळून गप्प का होते? याचे उत्तरही त्यांनी द्यावे. उमेश कोरगांवकर यांना झालेल्या मारहाणीनंतर हे चांगले झाले असे म्हणणारे केसरकर हेच होते. त्यामुळे नारायण राणे यांचे नाव न घेता केसरकर यांनी राजकारण करून दाखवावे. (वार्ताहर)