शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

विहाळी येथे गिधाड संरक्षण

By admin | Updated: November 30, 2015 01:06 IST

सुरेश सुतार : मृत जनावरे केंद्रात जमा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला

खेड : खेड तालुक्यातील विहाळी गावातील ओसाड माळरानावर निर्माण करण्यात आलेल्या गिधाड खाद्य केंद्रामध्ये मृत जनावरे जमा करून गिधाडांचे खाद्य म्हणून वापरात आणण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे़ यामुळे गिधाडांचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांचे संवर्धनही करण्यात येणार आहे. राज्य सरकारने आखलेल्या या अनोख्या उपक्रमाचे वन्यजीव व प्राणीमित्रांनी स्वागत केले आहे. यामुळे सध्या अल्प संख्येने असलेल्या गिधाडांचे संरक्षण आणि संवर्धन होणार आहे़ या केंद्रामध्ये मृत जनावरे आणून टाकणाऱ्यांना याचा मोबदला मिळणार असल्याची माहिती खेडचे परिमंडल वन अधिकारी सुरेश सुतार यांनी दिली़रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक अथवा दोन या प्रमाणात ही गिधाड खाद्य केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत़ शासनाच्या नियमानुसारच या केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. गेले काही वर्षे राज्यामध्ये नेहमी दिसणारी गिधाडे आता दिसेनाशी झाली आहेत. त्यामुळे गिधाडांचे अस्तित्व टिकून राहिल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्याचबरोबर राज्य सरकारच्या स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान सारख्या योजनांसह मोठ्या प्रमाणात होत असलेली जंगलतोड यामुळे गावागावातील मृत जनावरांना टाकण्यासाठी किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होत नव्हती. तसेच अशा मृत जनावरांमुळे येणारी दुर्गंधी आणि यामुळे गिधाडांची येणारी वावटळ यामुळे गावात तसेच परिसरात याचा मोठा त्रास होत होता. कालांतराने गावातील लोकांनी मृत जनावरे ठराविक ठिकणी जमिनीत पुरण्याची प्रथा सुरू केली़ परिणामी गिधाडांचे खाद्य नष्ट झाले़ त्यामुळे ही गिधाडे गेली काही वर्षे दिसेनाशी झाली़ याबाबत विविध वन्यजीव व प्राणीमित्र संरक्षण समितीने आवाज उठविला. सरकारच्या ही बाब लक्षात आणल्यानंतर राज्य सरकारनेही याबाबत गांभीर्याने विचार केला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी लोकवस्तीपासून एका बाजूला असलेल्या ओसाड जागेमध्ये अशी गिधाड खाद्य केंद्रे सुरू करण्याच्या योजनेला यामुळे मूर्त स्वरूप आले. ही गिधाड केंद्रे बांधून पूर्ण झाली असून, यामुळे गिधाडांना मृत जनावरांचे खाद्य उपलब्ध होणार असून, गिधाडांच्या संरक्षणास मदत होईल. (प्रतिनिधी)आयते खाद्य : स्थलांतर रोखण्यात यश मिळणारविहाळी गाव तसेच परिसरातील सर्व गावांमधील जनावरे मालकांनी त्यांची मृत जनावरे याच केंद्रामध्ये आणावयाची आहेत़ त्या बदल्यात त्यांना सरकारी दरानुसार योग्य मोबदला मिळणार असल्याचे सुतार यांनी सांगितले. यामुळे गिधाडांचे संवर्धन होणार असून, त्यांना आयते खाद्य मिळणार असल्याने त्यांचे अन्यत्र होणारे स्थलांतर रोखण्यात यामुळे यश मिळणार आहे़ गिधाडांचे संवर्धन यामुळे चांगल्या प्रकारे होणार आहे. संपर्क साधाशेतकरी मित्रांनी तसेच जनावरांच्या मालकांनी आपली मृत जनावरे या केंद्रामध्ये आणावीत.. याबाबत काही शंका असल्यास भरणे येथील परिमंडल वन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.