शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

विहाळी येथे गिधाड संरक्षण

By admin | Updated: November 30, 2015 01:06 IST

सुरेश सुतार : मृत जनावरे केंद्रात जमा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला

खेड : खेड तालुक्यातील विहाळी गावातील ओसाड माळरानावर निर्माण करण्यात आलेल्या गिधाड खाद्य केंद्रामध्ये मृत जनावरे जमा करून गिधाडांचे खाद्य म्हणून वापरात आणण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे़ यामुळे गिधाडांचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांचे संवर्धनही करण्यात येणार आहे. राज्य सरकारने आखलेल्या या अनोख्या उपक्रमाचे वन्यजीव व प्राणीमित्रांनी स्वागत केले आहे. यामुळे सध्या अल्प संख्येने असलेल्या गिधाडांचे संरक्षण आणि संवर्धन होणार आहे़ या केंद्रामध्ये मृत जनावरे आणून टाकणाऱ्यांना याचा मोबदला मिळणार असल्याची माहिती खेडचे परिमंडल वन अधिकारी सुरेश सुतार यांनी दिली़रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक अथवा दोन या प्रमाणात ही गिधाड खाद्य केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत़ शासनाच्या नियमानुसारच या केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. गेले काही वर्षे राज्यामध्ये नेहमी दिसणारी गिधाडे आता दिसेनाशी झाली आहेत. त्यामुळे गिधाडांचे अस्तित्व टिकून राहिल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्याचबरोबर राज्य सरकारच्या स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान सारख्या योजनांसह मोठ्या प्रमाणात होत असलेली जंगलतोड यामुळे गावागावातील मृत जनावरांना टाकण्यासाठी किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होत नव्हती. तसेच अशा मृत जनावरांमुळे येणारी दुर्गंधी आणि यामुळे गिधाडांची येणारी वावटळ यामुळे गावात तसेच परिसरात याचा मोठा त्रास होत होता. कालांतराने गावातील लोकांनी मृत जनावरे ठराविक ठिकणी जमिनीत पुरण्याची प्रथा सुरू केली़ परिणामी गिधाडांचे खाद्य नष्ट झाले़ त्यामुळे ही गिधाडे गेली काही वर्षे दिसेनाशी झाली़ याबाबत विविध वन्यजीव व प्राणीमित्र संरक्षण समितीने आवाज उठविला. सरकारच्या ही बाब लक्षात आणल्यानंतर राज्य सरकारनेही याबाबत गांभीर्याने विचार केला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी लोकवस्तीपासून एका बाजूला असलेल्या ओसाड जागेमध्ये अशी गिधाड खाद्य केंद्रे सुरू करण्याच्या योजनेला यामुळे मूर्त स्वरूप आले. ही गिधाड केंद्रे बांधून पूर्ण झाली असून, यामुळे गिधाडांना मृत जनावरांचे खाद्य उपलब्ध होणार असून, गिधाडांच्या संरक्षणास मदत होईल. (प्रतिनिधी)आयते खाद्य : स्थलांतर रोखण्यात यश मिळणारविहाळी गाव तसेच परिसरातील सर्व गावांमधील जनावरे मालकांनी त्यांची मृत जनावरे याच केंद्रामध्ये आणावयाची आहेत़ त्या बदल्यात त्यांना सरकारी दरानुसार योग्य मोबदला मिळणार असल्याचे सुतार यांनी सांगितले. यामुळे गिधाडांचे संवर्धन होणार असून, त्यांना आयते खाद्य मिळणार असल्याने त्यांचे अन्यत्र होणारे स्थलांतर रोखण्यात यामुळे यश मिळणार आहे़ गिधाडांचे संवर्धन यामुळे चांगल्या प्रकारे होणार आहे. संपर्क साधाशेतकरी मित्रांनी तसेच जनावरांच्या मालकांनी आपली मृत जनावरे या केंद्रामध्ये आणावीत.. याबाबत काही शंका असल्यास भरणे येथील परिमंडल वन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.