शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

राधानगरी तालुक्यात संरक्षण कठडे,रस्त्यांची दुरवस्था- दिशादर्शक फलकांचा अभाव,घाटांना वन्यजीव कायद्याचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:58 IST

राधानगरी : डोंगर दºयांनी व्यापलेल्या राधानगरी तालुक्यातील एकूण रस्त्यांपैकी ७५ टक्के रस्ते घाट मार्गाचे आहेत.

संजय पारकर ।राधानगरी : डोंगर दऱ्यांनी व्यापलेल्या राधानगरी तालुक्यातील एकूण रस्त्यांपैकी ७५ टक्के रस्ते घाट मार्गाचे आहेत. त्यामुळे येथे होणारी वाहतूक नेहमीच भीतीच्या छायेत असते. काही रस्त्यांचे अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी कठडे नाहीत. कोठेही दिशादर्शक फलक नाहीत. त्यातच रस्त्यांची नेहमीच असणारी दुरवस्था यामुळे वारंवार होणारे अपघातही चिंतेची बाब आहे.

राज्य मार्गाचा बराचसा भाग राधानगरी अभयारण्यातून त्याचा फटका रस्ते विकासाला बसतो. येथे अवघड वळणे व रस्त्याकडेने असणारी झाडे-झुडपे यांचा मोठा अडसर वाहतुकीला होतो.कोल्हापूरहून कोकण, गोव्याला जोडणारा राज्यमार्ग व निपाणी परिसरातील कर्नाटक राज्यातील भागाला कोकणाशी जोडणारा आंतरराज्य मार्ग हे दोन मार्ग गैबी तिट्ट्यापासून एकत्र जोडले आहेत. कोल्हापूरकडून येणाºया परिते-गैबी या २१ कि.मी.च्या रस्त्यात खिंडी व्हरवडे ते गैबी हा घाटमार्ग आहे. निपाणी-देवगड या राज्यमार्गावर सोळांकुरपासून घाट सुरू होतो. तो दाजीपूरपर्यंत, कोल्हापूर हद्दीपर्यंत ३८ कि.मी. व तेथून सिंधुदुर्ग हद्दीतील १२ कि.मी.चा फोंडाघाट असा ५० कि.मी. इतका प्रदीर्घ लांब आहे.

हा संपूर्ण भाग अभयारण्यातून जातो. येथे वन्यजीव कायद्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण करता येत नाही. त्याचा फटका येथील रस्ते विकासाच्या कामांना बसला आहे. रस्त्याला लागूनच मोठी झाडे, झुडपे आहेत. मोठमोठी अवघड वळणे असल्याने समोरून येणारे वाहन लवकर दिसत नाही. या टप्प्यात सतत लहान-मोठे अपघात होतात. मोठ्या दºया आहेत; मात्र बाजूच्या कठड्यांचा अभाव आहे.

बांधकाम विभागाने डिसेंबर २०१४ मध्ये केलेल्या वाहन गणतीत दाजीपूर येथे सप्ताहात ११०७३ मेट्रिक टन व मे २०१५ मध्ये १०३०० मेट्रिक टन भारमान झाले आहे. गैबीतिट्टा येथे डिसेंबर २०१४ मध्ये १४५३८ टन व मे २०१५ मध्ये १०११४ टन वाहतूक झाली आहे. आजमितीस विचार करता कोकणातून चिरे, वाळू व अन्य प्रकारची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

तालुक्यात मोठ्या वाहतुकीचे नऊ प्रमुख मार्ग आहेत. कोते-धामोड-शिरगाव-तारळे-पडळी-डीगस-दाजीपूर हा ४६ कि.मी.चा मार्ग जवळपास संपूर्ण घाटाचा आहे. म्हासुर्ली-राशिवडे हा १५ कि.मी. घाटमार्ग आहे. आकनूर-तारळे-दुर्गमानवाड-पडसाळी या रस्त्यावर १५ कि.मी.पेक्षा जास्त अवघड घाटमार्ग आहे. सोळांकुर-ऐनी-राजापूर-जळकेवाडी या मार्गात १५ कि.मी. घाटमार्ग व जंगल मार्ग आहे. हा मार्गही अभयारण्यातून जातो. परिणामी, तो अद्यापही बराच प्राथमिक स्थितीत आहे.बळींची वाढती संख्याजानेवारी २०१७ पासून या परिसरात जवळपास ३0 अपघात झाले आहेत. यात दोघांचा मृत्यू झाला. सातजण गंभीर व १३ जण किरकोळ जखमी झालेत.तालुक्यात गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या मार्गांवर सुमारे ८० अपघात झाले आहेत. यात १७ जणांना जीव गमवावा लागला आहे.त्याचप्रमाणे २७ गंभीर व २५ जण किरकोळ जखमी झाले आहेत.