शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
4
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
5
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
6
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
7
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
8
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
9
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
10
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
11
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
12
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
13
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
14
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
15
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
16
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
17
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
18
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
19
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
20
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 

५० हजारांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण

By admin | Updated: March 7, 2016 01:15 IST

चंद्रकांतदादा पाटील : अडचणीतील नागरी बँकांना सॉफ्ट लोन देण्याचा विचार

कोल्हापूर : सहकारी बँकांतील पाच लाख व पतसंस्थांमधीलही ५० हजारांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असून अडचणीतील नागरी बँकांना सॉफ्ट लोन देण्याबाबत सरकारच्या पातळीवर विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. वीरशैव को-आॅप. बँकेच्या मोबाईल बॅँकिंग सेवा प्रारंभ, पॉस मशीनद्वारे व्यवहार व वेबसाईटचे अनावरण रविवारी मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर अश्विनी रामाणे होत्या. वीरशैव बॅँकेच्या प्रगतीचे कौतुक करत मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील ६५० नागरी बँकांपैकी फार कमी बँका सुस्थितीत आहेत. केवळ राजकारणासाठी सुरू केलेल्या संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. चुकीचा कारभार करणाऱ्या संस्थांवर कारवाई व चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारण्याचे धोरण सरकारने घेतले आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक आहे, तरीही ग्रामीण भागातील नागरी बँकांनी सामान्य माणसाला उभे करण्याचे काम केल्याने अडचणीतील नागरी बॅँकांना सॉफ्टलोनच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याची सुरुवात रूपी बॅँकेपासून करत आहे. वीरशैव बॅँकेने पूर्णत: व्यावसायिकता स्वीकारत असताना व्यवसायात केलेली वाढ निश्चितच कौतुकास्पद असून इतर बँकांना आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार मंत्री पाटील यांनी काढले. सामान्य ग्राहक केंद्रबिंदू मानून वीरशैव बँकेने सुरू केलेली वाटचाल आधुनिकतेकडे जात आहे. बॅँकेचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे महापौर अश्विनी रामाणे यांनी सांगितले. स्वागत व प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे यांनी केले. बॅँकेच्या अध्यक्षा शकुंतला बनछोडे, संचालक गणपतराव पाटील, राजेश पाटील, सूर्यकांत पाटील, चंद्रकांत स्वामी, नानासाहेब नष्टे, आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष महादेव साखरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)अमृतमहोत्सवाला मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्रीवीरशैव बॅँकेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना निमंत्रित करण्याची इच्छा संचालकांची आहे, मुख्यमंत्री तर निश्चित येतील, पंतप्रधान येतील की नाही हे सांगता येणार नाही पण केंद्रीय अर्थमंत्री किंवा अर्थराज्यमंत्र्यांना कोल्हापुरात आणू, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले. कार्यक्रमातच दीड कोटीच्या ठेवी !बॅँकेच्या ७५ व्या वर्षांत ७५ कोटींच्या ठेवी गोळा कराव्यात, अशी मागणी करत ईश्वरचंद्र दलवाई यांनी एक कोटी, तर सरलाताई पाटील ५० लाख रुपये ठेवीची घोषणा कार्यक्रमातच केली.