शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा स्वतंत्र न्यायालयासाठी प्रस्ताव

By admin | Updated: December 11, 2015 00:53 IST

दावे प्रलंबित : राज्य सरकारकडे मागणी

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कामकाजासंबंधी जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेल्या दाव्यांची संख्या, त्यावर निकाल देण्यास होत असलेला विलंब आणि पक्षकारांची होणारी दमछाक लक्षात घेता पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर कोल्हापूर महानगरपालिकेतही एक स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागांचे दावे जिल्हा न्यायालयात दाखल होत असतात. सध्या ७०० ते ८०० दावे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे महानगरपालिकेचे मनुष्यबळ आणि पैसाही वारेमाप खर्च होत आहे. एखाद्या दाव्यावर कधी निकाल लागेल हे काही सांगता येत नाही, त्यामुळे त्यात वेळ खूप जातो. जिल्हा न्यायालयात इतर दाव्यांतून महानगरपालिकेसाठीच्या दाव्यांना तारखा मिळण्यास वेळ लागत आहे. या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या इमारतीतच एक स्वतंत्र न्यायालय सुरू करावे, अशी मागणी मनपा प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे. महानगरपालिकेच्या विधी विभागातील वकील न्यायालयात दावे लवकर निकाली निघावेत म्हणून प्रयत्न करत नाहीत, असेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे असे स्वतंत्र न्यायालय झाले तर याचिकाकर्त्यांना लवकर न्याय मिळेल, त्यांचा वेळ वाचेल असा मनपा प्रशासनाचा दावा आहे. (प्रतिनिधी)