शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नोंदणीआडून नव्या बालगृहांचे प्रस्ताव, स्वयंसेवी संस्थांकडून तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 05:36 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कायद्याचा आधार घेऊन राज्यात अस्तित्वात असलेल्या बालगृहांच्या नोंदणीचे काम सुरू आहे; परंतु त्याच्या आडून काही स्वयंसेवी संस्थांकडून नव्याने बालगृहे सुरू करण्याचे प्रस्तावही दाखल होत आहेत.

विश्वास पाटील कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कायद्याचा आधार घेऊन राज्यात अस्तित्वात असलेल्या बालगृहांच्या नोंदणीचे काम सुरू आहे; परंतु त्याच्या आडून काही स्वयंसेवी संस्थांकडून नव्याने बालगृहे सुरू करण्याचे प्रस्तावही दाखल होत आहेत. मुले बालगृहांपेक्षा कुटुंबातच राहिली पाहिजेत हे धोरण असताना पुन्हा बालगृहांचे प्रस्ताव स्वीकारले जात असल्याने या क्षेत्रात काम करणाºया जाणकारांकडून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.केंद्राने १ जानेवारी २०१६पासून बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ लागू केला आहे. या कायद्याच्या कलम ४१ (१) अंतर्गत बालकांसाठी कार्यरत आणि इच्छुक असणाºया सर्व अनुदानित, विनाअनुदानित, शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी संस्था यांनी या कायद्यांतर्गत शासनाकडून नोंदणी प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित संस्थांकडून नोंदणी करण्यासाठी धावपळ सुरू असून, त्याला जोडूनच काही जिल्ह्यांतून नवीन बालगृहांचे प्रस्ताव सादर केले जात आहेत.आम्ही फक्त जुन्याच संस्थांची नोंदणी करून घेत आहोत, असे आयुक्तालय म्हणत असले तरी मग नवीन प्रस्ताव का स्वीकारले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आता नव्याने नोंदणी होणाºया आणि सध्या सुरू असलेल्या बालगृहांत बालकल्याण समितीमार्फतच प्रवेश दिले जाणार आहेत. मग मुले येणार कुठून? संस्था हा बालकांसाठी अंतिम पर्याय म्हणूनच स्वीकारला पाहिजे या तत्त्वाला हरताळ फासला जाणार आहे.- अतुल देसाई, अध्यक्ष, आभास फाउंडेशन, कोल्हापूर