शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

ग्रामपंचायतींना बांधकाम परवाना देण्याचा प्रस्ताव अजून मंत्रालयातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हाधिकारीस्तराऐवजी ग्रामपंचायत पातळीवरच गावठाणातील बांधकामाचे परवाने देण्याचा अधिकार बहाल करणारा निर्णय ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हाधिकारीस्तराऐवजी ग्रामपंचायत पातळीवरच गावठाणातील बांधकामाचे परवाने देण्याचा अधिकार बहाल करणारा निर्णय ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केला. पण त्यालाही सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरी त्याचे कायद्यात रूपांतर झाले नसल्याने, ही निव्वळ घोषणाच राहिली आहे. परवान्यासाठी ग्रामीण जनतेचे मात्र शहरातील नगररचना विभागाकडे हेलपाटे सुरूच आहेत. यासंदर्भात मंत्रालयात ग्रामविकास विभागात चौकशी केली असता, प्रस्ताव तयार आहे, पुढील प्रक्रिया काही दिवसात सुरू होईल असे सांगण्यात आले.

गावात घर बांधायचे म्हटले तर परवान्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर असणाऱ्या अधिकारांतर्गत नगररचना विभागाकडे परवान्यासाठी अर्ज करावा लागताे. यात वेळ व पैसा जास्त खर्च होतो. परवाने मिळण्यासही विलंब होतो. शिवाय विनापरवाना बांधकामेही वाढतात. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच गावपातळीवरच हे अधिकार द्यावेत, अशी मागणी सातत्याने होत होती. याची दखल घेत महाविकास आघाडी सरकारमध्ये ग्रामविकासमंत्रीपद मिळाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायतीमार्फतच बांधकाम परवाने दिले जातील, अशी घोषणा केली. पण सरकार सत्तेवर येऊन वर्ष उलटले तरी या घोषणेचे अध्यादेशात रूपांतरण झालेले नाही. त्यामुळे गावपातळीवर परवान्यावरून संभ्रमाचे वातावरण आहे. कोरोनाकाळात याकडे लक्षच दिलेले नसल्यामुळे ही घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठीचा कायदा दुरुस्तीचा प्रस्ताव अजून मंत्रालयातच पडून आहे. याचे अध्यादेशात रूपांतरण करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यास अजून किमान महिनाभराचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर तो विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात तो अंमलात येणार आहे. तोपर्यंत ग्रामीण जनतेच्या नशिबात नगररचना विभागाचे हेलपाटेच असणार आहेत.

चौकट ०१

जनतेमध्ये संभ्रम

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे मागील आठवड्यात कोल्हापूर दौेऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गावठाणात छोटे (ठराविक मर्यादेपर्यंत) बांधकामासाठी परवाना लागणार नसल्याचे सांगितले होते. एका बाजूला लोक परवान्याबाबतीत विचारायला गेले की, त्यांना अजून कायदा झाला नसल्याचे सांगून पुन्हा नगररचना विभागाकडे पाठवले जाते, तर दुसऱ्या बाजूला परवान्याची गरज नसल्याचे सांगितले जात असल्याने, नेमके खरे काय, यावरून ग्रामीण जनतेमध्ये संभ्रम आहे.

चौकट ०२

ग्रामपंचायतीही स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत

बांधकाम परवान्याबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा, याबाबत शासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण नसल्याने जनतेप्रमाणेच ग्रामपंचायतीचे प्रशासनही संभ्रमात आहे. या घोषणेबाबतची स्पष्टता आणि निर्णय लवकरात लवकर ग्रामपंचायतींना पाठवून संभ्रम दूर करावा, अशी मागणी होत आहे.