शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

ग्रामपंचायतींना बांधकाम परवाना देण्याचा प्रस्ताव अजून मंत्रालयातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हाधिकारीस्तराऐवजी ग्रामपंचायत पातळीवरच गावठाणातील बांधकामाचे परवाने देण्याचा अधिकार बहाल करणारा निर्णय ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हाधिकारीस्तराऐवजी ग्रामपंचायत पातळीवरच गावठाणातील बांधकामाचे परवाने देण्याचा अधिकार बहाल करणारा निर्णय ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केला. पण त्यालाही सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरी त्याचे कायद्यात रूपांतर झाले नसल्याने, ही निव्वळ घोषणाच राहिली आहे. परवान्यासाठी ग्रामीण जनतेचे मात्र शहरातील नगररचना विभागाकडे हेलपाटे सुरूच आहेत. यासंदर्भात मंत्रालयात ग्रामविकास विभागात चौकशी केली असता, प्रस्ताव तयार आहे, पुढील प्रक्रिया काही दिवसात सुरू होईल असे सांगण्यात आले.

गावात घर बांधायचे म्हटले तर परवान्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर असणाऱ्या अधिकारांतर्गत नगररचना विभागाकडे परवान्यासाठी अर्ज करावा लागताे. यात वेळ व पैसा जास्त खर्च होतो. परवाने मिळण्यासही विलंब होतो. शिवाय विनापरवाना बांधकामेही वाढतात. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच गावपातळीवरच हे अधिकार द्यावेत, अशी मागणी सातत्याने होत होती. याची दखल घेत महाविकास आघाडी सरकारमध्ये ग्रामविकासमंत्रीपद मिळाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायतीमार्फतच बांधकाम परवाने दिले जातील, अशी घोषणा केली. पण सरकार सत्तेवर येऊन वर्ष उलटले तरी या घोषणेचे अध्यादेशात रूपांतरण झालेले नाही. त्यामुळे गावपातळीवर परवान्यावरून संभ्रमाचे वातावरण आहे. कोरोनाकाळात याकडे लक्षच दिलेले नसल्यामुळे ही घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठीचा कायदा दुरुस्तीचा प्रस्ताव अजून मंत्रालयातच पडून आहे. याचे अध्यादेशात रूपांतरण करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यास अजून किमान महिनाभराचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर तो विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात तो अंमलात येणार आहे. तोपर्यंत ग्रामीण जनतेच्या नशिबात नगररचना विभागाचे हेलपाटेच असणार आहेत.

चौकट ०१

जनतेमध्ये संभ्रम

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे मागील आठवड्यात कोल्हापूर दौेऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गावठाणात छोटे (ठराविक मर्यादेपर्यंत) बांधकामासाठी परवाना लागणार नसल्याचे सांगितले होते. एका बाजूला लोक परवान्याबाबतीत विचारायला गेले की, त्यांना अजून कायदा झाला नसल्याचे सांगून पुन्हा नगररचना विभागाकडे पाठवले जाते, तर दुसऱ्या बाजूला परवान्याची गरज नसल्याचे सांगितले जात असल्याने, नेमके खरे काय, यावरून ग्रामीण जनतेमध्ये संभ्रम आहे.

चौकट ०२

ग्रामपंचायतीही स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत

बांधकाम परवान्याबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा, याबाबत शासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण नसल्याने जनतेप्रमाणेच ग्रामपंचायतीचे प्रशासनही संभ्रमात आहे. या घोषणेबाबतची स्पष्टता आणि निर्णय लवकरात लवकर ग्रामपंचायतींना पाठवून संभ्रम दूर करावा, अशी मागणी होत आहे.