शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींना बांधकाम परवाना देण्याचा प्रस्ताव अजून मंत्रालयातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हाधिकारीस्तराऐवजी ग्रामपंचायत पातळीवरच गावठाणातील बांधकामाचे परवाने देण्याचा अधिकार बहाल करणारा निर्णय ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हाधिकारीस्तराऐवजी ग्रामपंचायत पातळीवरच गावठाणातील बांधकामाचे परवाने देण्याचा अधिकार बहाल करणारा निर्णय ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केला. पण त्यालाही सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरी त्याचे कायद्यात रूपांतर झाले नसल्याने, ही निव्वळ घोषणाच राहिली आहे. परवान्यासाठी ग्रामीण जनतेचे मात्र शहरातील नगररचना विभागाकडे हेलपाटे सुरूच आहेत. यासंदर्भात मंत्रालयात ग्रामविकास विभागात चौकशी केली असता, प्रस्ताव तयार आहे, पुढील प्रक्रिया काही दिवसात सुरू होईल असे सांगण्यात आले.

गावात घर बांधायचे म्हटले तर परवान्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर असणाऱ्या अधिकारांतर्गत नगररचना विभागाकडे परवान्यासाठी अर्ज करावा लागताे. यात वेळ व पैसा जास्त खर्च होतो. परवाने मिळण्यासही विलंब होतो. शिवाय विनापरवाना बांधकामेही वाढतात. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच गावपातळीवरच हे अधिकार द्यावेत, अशी मागणी सातत्याने होत होती. याची दखल घेत महाविकास आघाडी सरकारमध्ये ग्रामविकासमंत्रीपद मिळाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायतीमार्फतच बांधकाम परवाने दिले जातील, अशी घोषणा केली. पण सरकार सत्तेवर येऊन वर्ष उलटले तरी या घोषणेचे अध्यादेशात रूपांतरण झालेले नाही. त्यामुळे गावपातळीवर परवान्यावरून संभ्रमाचे वातावरण आहे. कोरोनाकाळात याकडे लक्षच दिलेले नसल्यामुळे ही घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठीचा कायदा दुरुस्तीचा प्रस्ताव अजून मंत्रालयातच पडून आहे. याचे अध्यादेशात रूपांतरण करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यास अजून किमान महिनाभराचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर तो विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात तो अंमलात येणार आहे. तोपर्यंत ग्रामीण जनतेच्या नशिबात नगररचना विभागाचे हेलपाटेच असणार आहेत.

चौकट ०१

जनतेमध्ये संभ्रम

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे मागील आठवड्यात कोल्हापूर दौेऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गावठाणात छोटे (ठराविक मर्यादेपर्यंत) बांधकामासाठी परवाना लागणार नसल्याचे सांगितले होते. एका बाजूला लोक परवान्याबाबतीत विचारायला गेले की, त्यांना अजून कायदा झाला नसल्याचे सांगून पुन्हा नगररचना विभागाकडे पाठवले जाते, तर दुसऱ्या बाजूला परवान्याची गरज नसल्याचे सांगितले जात असल्याने, नेमके खरे काय, यावरून ग्रामीण जनतेमध्ये संभ्रम आहे.

चौकट ०२

ग्रामपंचायतीही स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत

बांधकाम परवान्याबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा, याबाबत शासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण नसल्याने जनतेप्रमाणेच ग्रामपंचायतीचे प्रशासनही संभ्रमात आहे. या घोषणेबाबतची स्पष्टता आणि निर्णय लवकरात लवकर ग्रामपंचायतींना पाठवून संभ्रम दूर करावा, अशी मागणी होत आहे.