शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

दोन ‘एमआयडीसीं’सह अठरा गावांचा हद्दवाढीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:29 IST

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने मागचा-पुढचा कोणताही विचार न करता २०१५ चा हद्दवाढीचा जुनाच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. हद्दवाढीच्या ...

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने मागचा-पुढचा कोणताही विचार न करता २०१५ चा हद्दवाढीचा जुनाच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. हद्दवाढीच्या प्रस्तावात दोन ‘एमआयडीसीं’सह अठरा गावांचा समावेश करण्यात आला आहे. शहराच्या हद्दवाढीला होणारा विरोध कसा कमी करता येईल, याचा कोणताही विचार प्रशासनाने केलेला नाही.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना, येथील एक कार्यक्रमात शहराच्या हद्दवाढीचा विषय उपस्थित करून या विषयाला नव्याने तोंड फोडले. शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला, तर जरुर विचार करून शहराची हद्दवाढ केली जाईल, अशी ग्वाही मंत्री शिंदे यांनी दिली होती. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी अशा प्रस्तावाबाबत प्रशासनाकडे आग्रह धरला होता.

महापालिका प्रशासनाने मात्र गेल्या अनेक वर्षांच्या मागणीचा नीट विचार न करता आणि लोकांचा विरोध कसा कमी होईल, याचा विचार न करता दोन ‘एमआयडीसीं’सह अठरा गावांचा जुनाच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. ११ जून २०१५ रोजी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानंतर तो राज्य सरकारकडे पाठविण्यातही आला होता. आता तोच प्रस्ताव पुन्हा एकदा पाठविला.

प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असला, तरी आता तो तातडीने मंजूर होणे अशक्य आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू करीत असल्याने किमान सहा महिने आधी हद्दवाढ केली जाऊ नये, असे कळविले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने सरकारकडून मंजूर होणार नाही. महापालिकेची निवडणूक झाल्यानंतरच त्याचा विचार होऊ शकतो.

- हद्दवाढ प्रस्तावातील गावे -

पीरवाडी, बालिंगे, नागदेववाडी, शिये, वडणगे, आंबेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा, शिरोली, उचगाव, गोकुळ शिरगाव, नागाव, वळिवडे, गांधीनगर, मुडशिंगी तसेच शिरोली एमआयडीसी व गोकुळ शिरगाव एमआयडीसी.

हणमंतवाडी, शिंगणापूर?

भौगोलिक सलगता हा एक महत्त्वाचा निकष हद्दवाढीचा निर्णय घेताना विचारात घेतला जातो. महापालिका प्रशासनाने याचा विचारच केलेला नाही. दोन एमआयडीसींसह गोकुळ शिरगाव, शिरोली, नागाव, वळिवडे या गावांचा समावेश करून वादाला खतपाणी घातले आहे. शहराला लागून असलेली हणमंतवाडी व शिंगणापूर या दोन गावांना मात्र वगळले आहे. याचाच अर्थ हा प्रस्तावसुध्दा सदोष आहे.