शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

दोन ‘एमआयडीसीं’सह अठरा गावांचा हद्दवाढीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:29 IST

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने मागचा-पुढचा कोणताही विचार न करता २०१५ चा हद्दवाढीचा जुनाच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. हद्दवाढीच्या ...

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने मागचा-पुढचा कोणताही विचार न करता २०१५ चा हद्दवाढीचा जुनाच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. हद्दवाढीच्या प्रस्तावात दोन ‘एमआयडीसीं’सह अठरा गावांचा समावेश करण्यात आला आहे. शहराच्या हद्दवाढीला होणारा विरोध कसा कमी करता येईल, याचा कोणताही विचार प्रशासनाने केलेला नाही.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना, येथील एक कार्यक्रमात शहराच्या हद्दवाढीचा विषय उपस्थित करून या विषयाला नव्याने तोंड फोडले. शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला, तर जरुर विचार करून शहराची हद्दवाढ केली जाईल, अशी ग्वाही मंत्री शिंदे यांनी दिली होती. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी अशा प्रस्तावाबाबत प्रशासनाकडे आग्रह धरला होता.

महापालिका प्रशासनाने मात्र गेल्या अनेक वर्षांच्या मागणीचा नीट विचार न करता आणि लोकांचा विरोध कसा कमी होईल, याचा विचार न करता दोन ‘एमआयडीसीं’सह अठरा गावांचा जुनाच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. ११ जून २०१५ रोजी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानंतर तो राज्य सरकारकडे पाठविण्यातही आला होता. आता तोच प्रस्ताव पुन्हा एकदा पाठविला.

प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असला, तरी आता तो तातडीने मंजूर होणे अशक्य आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू करीत असल्याने किमान सहा महिने आधी हद्दवाढ केली जाऊ नये, असे कळविले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने सरकारकडून मंजूर होणार नाही. महापालिकेची निवडणूक झाल्यानंतरच त्याचा विचार होऊ शकतो.

- हद्दवाढ प्रस्तावातील गावे -

पीरवाडी, बालिंगे, नागदेववाडी, शिये, वडणगे, आंबेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा, शिरोली, उचगाव, गोकुळ शिरगाव, नागाव, वळिवडे, गांधीनगर, मुडशिंगी तसेच शिरोली एमआयडीसी व गोकुळ शिरगाव एमआयडीसी.

हणमंतवाडी, शिंगणापूर?

भौगोलिक सलगता हा एक महत्त्वाचा निकष हद्दवाढीचा निर्णय घेताना विचारात घेतला जातो. महापालिका प्रशासनाने याचा विचारच केलेला नाही. दोन एमआयडीसींसह गोकुळ शिरगाव, शिरोली, नागाव, वळिवडे या गावांचा समावेश करून वादाला खतपाणी घातले आहे. शहराला लागून असलेली हणमंतवाडी व शिंगणापूर या दोन गावांना मात्र वगळले आहे. याचाच अर्थ हा प्रस्तावसुध्दा सदोष आहे.