शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

दोन ‘एमआयडीसीं’सह अठरा गावांचा हद्दवाढीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:29 IST

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने मागचा-पुढचा कोणताही विचार न करता २०१५ चा हद्दवाढीचा जुनाच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. हद्दवाढीच्या ...

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने मागचा-पुढचा कोणताही विचार न करता २०१५ चा हद्दवाढीचा जुनाच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. हद्दवाढीच्या प्रस्तावात दोन ‘एमआयडीसीं’सह अठरा गावांचा समावेश करण्यात आला आहे. शहराच्या हद्दवाढीला होणारा विरोध कसा कमी करता येईल, याचा कोणताही विचार प्रशासनाने केलेला नाही.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना, येथील एक कार्यक्रमात शहराच्या हद्दवाढीचा विषय उपस्थित करून या विषयाला नव्याने तोंड फोडले. शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला, तर जरुर विचार करून शहराची हद्दवाढ केली जाईल, अशी ग्वाही मंत्री शिंदे यांनी दिली होती. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी अशा प्रस्तावाबाबत प्रशासनाकडे आग्रह धरला होता.

महापालिका प्रशासनाने मात्र गेल्या अनेक वर्षांच्या मागणीचा नीट विचार न करता आणि लोकांचा विरोध कसा कमी होईल, याचा विचार न करता दोन ‘एमआयडीसीं’सह अठरा गावांचा जुनाच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. ११ जून २०१५ रोजी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानंतर तो राज्य सरकारकडे पाठविण्यातही आला होता. आता तोच प्रस्ताव पुन्हा एकदा पाठविला.

प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असला, तरी आता तो तातडीने मंजूर होणे अशक्य आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू करीत असल्याने किमान सहा महिने आधी हद्दवाढ केली जाऊ नये, असे कळविले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने सरकारकडून मंजूर होणार नाही. महापालिकेची निवडणूक झाल्यानंतरच त्याचा विचार होऊ शकतो.

- हद्दवाढ प्रस्तावातील गावे -

पीरवाडी, बालिंगे, नागदेववाडी, शिये, वडणगे, आंबेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा, शिरोली, उचगाव, गोकुळ शिरगाव, नागाव, वळिवडे, गांधीनगर, मुडशिंगी तसेच शिरोली एमआयडीसी व गोकुळ शिरगाव एमआयडीसी.

हणमंतवाडी, शिंगणापूर?

भौगोलिक सलगता हा एक महत्त्वाचा निकष हद्दवाढीचा निर्णय घेताना विचारात घेतला जातो. महापालिका प्रशासनाने याचा विचारच केलेला नाही. दोन एमआयडीसींसह गोकुळ शिरगाव, शिरोली, नागाव, वळिवडे या गावांचा समावेश करून वादाला खतपाणी घातले आहे. शहराला लागून असलेली हणमंतवाडी व शिंगणापूर या दोन गावांना मात्र वगळले आहे. याचाच अर्थ हा प्रस्तावसुध्दा सदोष आहे.