शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

प्रस्ताव पुन्हा ‘हद्द’पार ?

By admin | Updated: June 14, 2015 01:52 IST

हद्दवाढ : मतैक्य घडविण्याची जबाबदारी महापालिकेचीच; चंद्रकांतदादांनी हात झटकले

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर महासभेच्या मान्यतेने सरकारकडे पाठविण्यात येत असला तरी, नव्याने सत्तेवर विराजमान झालेल्या राज्यकर्त्यांची भूमिका ‘नरो वा कुंजरो वा’ अशीच आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हद्दवाढीसंदर्भात एकमत करण्याची जबाबदारी ही मुख्यत: महानगरपालिकेची असल्याचे सांगत आपले अंग यातून काढून घेतले. त्यामुळेच या प्रस्तावाचे भवितव्यही अंधारातच आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शहराची रखडलेली हद्दवाढ करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु आता सत्तेवर आल्यानंतर त्यांच्याही भूमिकेत बदल झालेला दिसत आहे. त्यामुळे हद्दवाढीचा प्रस्ताव पुन्हा एकदा हद्दपार होईल का, अशीच भीती निर्माण झाली आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात महानगरपालिकेने शहराची हद्दवाढ होऊन मिळावी म्हणून किमान पाच ते सहा वेळा प्रस्ताव पाठविले; परंतु सत्तेत असलेल्या कोल्हापूरच्याच नेत्यांनी या प्रस्तावास वेळोवेळी खो घातला. त्यामुळे त्यांच्या काळात हद्दवाढ झाली नाही. हा मुद्दा भाजप-शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत उचलून धरला होता. आम्ही सत्तेत आल्यास शहराची हद्दवाढ करण्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी येथील जनतेला दिले होते. मात्र, त्यांनीही आता या विषयात भाग घेऊन जनतेचा रोष ओढवून घ्यायला नको म्हणून त्यापासून तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असल्याचे दिसते. गावांची सहमती आवश्यक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हद्दवाढीच्या प्रस्तावावर एकमत करण्याची जबाबदारी ही महापालिकेचीच असल्याचे त्यांनी सांगितले. दादांच्या या भूमिकेतून सरकारला या वादात पडायची इच्छा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या गावांचा हद्दवाढीच्या प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे, त्या गावांतील नागरिकांना हद्दवाढ दोघांच्याही फायद्याची कशी आहे, हे पालिकेचे अधिकारी, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी समजून सांगावी. त्यात जर गावांचं हित असेल तर ती गावे तयार होतील. हद्दवाढीला शंभर टक्के गावे तयार होतील असेही नाही; परंतु जास्तीत जास्त गावांची सहमती घेणे आवश्यक आहे. गावातील नागरिकांना शहरात जावे असे वाटले पाहिजे; म्हणूनच महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे पालकमंत्री म्हणाले. स्वार्थासाठी हद्दवाढ लादू नका : महादेव महाडिक शिरोली : महापालिकेच्या राजकारणात स्वत:च्या स्वार्थासाठी काही राजकीय नेतेमंडळी अन्यायी हद्दवाढ ग्रामीण भागातील जनतेवर लादत आहेत, पण हे कदापि शक्य होणार नाही. ग्रामीण भागातील जनता ही हद्दवाढ जनआंदोलन उभा करून उधळून लावेल. मी २० गावांच्या ग्रामीण भागातील जनतेबरोबर हद्दवाढीला विरोध करणार, असे आमदार महादेवराव महाडिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, शहरालगतची उपनगरे वाढली, पण या शहराचा विकास वाढला नाही. शहरातील कोणत्या भागात कोणत्या उपनगरांना चांगले रस्ते आहेत, ड्रेनेज सुविधा, कचरा प्रश्न, दूषित पाणी आदी प्रश्न प्रलंबितच आहेत. हद्दवाढ करून विकास फंड उपलब्ध करण्यासाठी शासनाकडेच निधी नाही, असेही आमदार महादेवराव महाडिक म्हणाले.