शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

घरफाळा वसुली भांडवली मूल्यावर

By admin | Updated: March 28, 2016 00:07 IST

--ग्रामपंचायतींना दिलासा : घटनेतील समानतेच्या कायद्यानुसार निर्णय

अतुल आंबी --इचलकरंजी --भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा वसुली करण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमार्फत घरफाळा वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या निर्णयासाठी एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१५ पर्यंत वसुलीसाठी स्थगिती असल्याने वसुलीमध्ये थोडी दमछाक होताना दिसत आहे. मात्र, या निर्णयामुळे सर्वांना समानतेचा न्याय मिळाला असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.सन २००१ सालापूर्वी ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतींची घरफाळा वसुली भांडवली मूल्यावरच केली जात होती. मात्र, गावपातळीवरील गट-तट व राजकारण यामधून काही ठिकाणी अन्याय होत होता. त्यामुळे शासनाने २००१ पासून क्षेत्रफळावर आधारित घरफाळ्याची वसुली सुरू केली. यामध्ये घराच्या वर्गवारीनुसार ठरलेल्या दराला घराच्या क्षेत्रफळाने गुणाकार करून घरफाळा ठरविला जात होता. मात्र, जुनी घरे व नवीन घरे यासाठी क्षेत्रफळावर आधारित एकच दर लागू होऊ लागला. म्हणून डॉ. विजय शिंदे यांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यामध्ये घटनेच्या समानतेच्या कायद्याला या क्षेत्रफळानुसार वसुलीमुळे धक्का लागत असल्याचे नमूद केले.त्यावर वेळोवेळी सुनावणी होऊन डिसेंबर २०१५ मध्ये न्यायालयाने भांडवली मूल्यावरच घरफाळा वसुली करण्याचा निर्णय शासनाला दिला. त्यानुसार २०१५-२०१६ ची घरफाळा वसुली भांडवली मूल्यावर सुरू झाली आहे. यामध्ये गावातील रेडिरेकनरचा दर (किमान मूल्य) त्याला भारांक १ (एक हजारच्या भागाने) नुसार भागाकार करून त्याला घराच्या वर्गवारीनुसार ठरलेल्या दराप्रमाणे गुणाकार करून त्यानुसार घरफाळा लागू होणार आहे. म्हणजेच दहा लाख रुपये किमतीच्या आरसीसी घराचा घरफाळा सुमारे १२०० रुपयेपर्यंत होईल. शासनाच्या या निर्णयामुळे जुन्या इमारतींना कमी, तर नवीन इमारतींना जादा असा घरफाळा लागू होणार आहे.