शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

आघाड्या, अपक्षांना चिन्हे नसल्याने प्रचार यंत्रणा अडखळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 00:24 IST

इचलकरंजी नगरपालिका निवडणूक : आजच्या चिन्ह वाटपाकडे सर्वांचे लक्ष; न्यायालयीन प्रक्रियेमुळे १२८ जणांना चिन्हच नाही

राजाराम पाटील ल्ल इचलकरंजी शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांनी घरोघरी फिरून जनसंपर्क वाढविण्याबरोबरच नेतेमंडळींनी छोट्या-मोठ्या बैठका आणि कोपरा सभा घेण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयीन खटलेबाजीमुळे निवडणूक प्रक्रिया लांबल्यामुळे शनिवारी होणारे चिन्ह वाटप प्रलंबित राहिले आहे. अशा परिस्थितीने राजकीय पक्ष वगळता आघाड्या, गट आणि अपक्षांना चिन्हे मिळाली नसल्याने त्यांची प्रचार यंत्रणा काहीशी अडखळली आहे. येथील नगराध्यक्ष पदासाठी कॉँग्रेस, भाजप, शिवसेना, एमआयएम या पक्षांसह आणखीन तीन उमेदवार उभे आहेत. तसेच कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शाहू आघाडी विरुद्ध भाजप, ताराराणी आघाडी अशा दोन युती निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय शिवसेनेचे २४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घ्यायची मुदत ११ नोव्हेंबरला आणि चिन्ह वाटप १२ नोव्हेंबरला होणार होते; पण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शीतल आंबी यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्याचा निकालही लागला; पण ज्याठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत न्यायालयीन खटला दाखल झाला आहे, तेथे माघार घेण्यासाठी दोन दिवस (सुट्या वगळता) वाढ देण्यात यावी आणि त्यानंतर लगतच्या दिवशी चिन्ह वाटप करण्यात यावे, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इचलकरंजीत माघार घेण्याची अंतिम मुदत मंगळवारी असून, आज, बुधवारी चिन्ह वाटप होणार आहे. दरम्यानच्या काळात गेल्या आठवडाभरापासून उमेदवारांनी आपापल्या प्रभागामध्ये घरोघरी फिरून मतदारांशी जनसंपर्क ठेवला आहे. मतदारांशी भेटताना आपण या प्रभागात उभे असून, आपल्याला मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांच्या उमेदवारांची निवडणूक चिन्हे निश्चित असल्यामुळे त्यांच्याकडून मतदारांना चिन्ह सांगितले जात आहे; पण शाहू आघाडी, ताराराणी आघाडी आणि अपक्षांना अद्याप चिन्ह मिळत नसल्याने त्यांना मात्र अद्याप आपणाला चिन्ह मिळालेले नाही. चिन्ह मिळाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याकडे येऊन चिन्हाची माहिती देण्यात येईल. तसेच उमेदवाराचे छायाचित्र आणि अन्य माहितीबरोबर चिन्ह छापलेली पत्रकेही वाटली जातील, असे सांगितले जात आहे. १२८ उमेदवारांसमोर चिन्हाचे प्रश्नचिन्ह नगरपालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे ४९, राष्ट्रवादीचे ८, भाजपचे ३९, शिवसेनेचे २४, असे उमेदवार उभे आहेत. यांच्याव्यतिरिक्त शाहू आघाडी, ताराराणी आघाडी आणि अपक्ष अशा उमेदवारांची संख्या १२८ आहे. त्यामुळे चिन्ह वाटप झाल्यानंतरच या उमेदवारांना चिन्ह सांगण्यासाठी आणखीन एकदा आपल्या प्रभागाची फेरी करावी लागणार आहे.