शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

आघाड्या, अपक्षांना चिन्हे नसल्याने प्रचार यंत्रणा अडखळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 00:24 IST

इचलकरंजी नगरपालिका निवडणूक : आजच्या चिन्ह वाटपाकडे सर्वांचे लक्ष; न्यायालयीन प्रक्रियेमुळे १२८ जणांना चिन्हच नाही

राजाराम पाटील ल्ल इचलकरंजी शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांनी घरोघरी फिरून जनसंपर्क वाढविण्याबरोबरच नेतेमंडळींनी छोट्या-मोठ्या बैठका आणि कोपरा सभा घेण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयीन खटलेबाजीमुळे निवडणूक प्रक्रिया लांबल्यामुळे शनिवारी होणारे चिन्ह वाटप प्रलंबित राहिले आहे. अशा परिस्थितीने राजकीय पक्ष वगळता आघाड्या, गट आणि अपक्षांना चिन्हे मिळाली नसल्याने त्यांची प्रचार यंत्रणा काहीशी अडखळली आहे. येथील नगराध्यक्ष पदासाठी कॉँग्रेस, भाजप, शिवसेना, एमआयएम या पक्षांसह आणखीन तीन उमेदवार उभे आहेत. तसेच कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शाहू आघाडी विरुद्ध भाजप, ताराराणी आघाडी अशा दोन युती निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय शिवसेनेचे २४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घ्यायची मुदत ११ नोव्हेंबरला आणि चिन्ह वाटप १२ नोव्हेंबरला होणार होते; पण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शीतल आंबी यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्याचा निकालही लागला; पण ज्याठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत न्यायालयीन खटला दाखल झाला आहे, तेथे माघार घेण्यासाठी दोन दिवस (सुट्या वगळता) वाढ देण्यात यावी आणि त्यानंतर लगतच्या दिवशी चिन्ह वाटप करण्यात यावे, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इचलकरंजीत माघार घेण्याची अंतिम मुदत मंगळवारी असून, आज, बुधवारी चिन्ह वाटप होणार आहे. दरम्यानच्या काळात गेल्या आठवडाभरापासून उमेदवारांनी आपापल्या प्रभागामध्ये घरोघरी फिरून मतदारांशी जनसंपर्क ठेवला आहे. मतदारांशी भेटताना आपण या प्रभागात उभे असून, आपल्याला मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांच्या उमेदवारांची निवडणूक चिन्हे निश्चित असल्यामुळे त्यांच्याकडून मतदारांना चिन्ह सांगितले जात आहे; पण शाहू आघाडी, ताराराणी आघाडी आणि अपक्षांना अद्याप चिन्ह मिळत नसल्याने त्यांना मात्र अद्याप आपणाला चिन्ह मिळालेले नाही. चिन्ह मिळाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याकडे येऊन चिन्हाची माहिती देण्यात येईल. तसेच उमेदवाराचे छायाचित्र आणि अन्य माहितीबरोबर चिन्ह छापलेली पत्रकेही वाटली जातील, असे सांगितले जात आहे. १२८ उमेदवारांसमोर चिन्हाचे प्रश्नचिन्ह नगरपालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे ४९, राष्ट्रवादीचे ८, भाजपचे ३९, शिवसेनेचे २४, असे उमेदवार उभे आहेत. यांच्याव्यतिरिक्त शाहू आघाडी, ताराराणी आघाडी आणि अपक्ष अशा उमेदवारांची संख्या १२८ आहे. त्यामुळे चिन्ह वाटप झाल्यानंतरच या उमेदवारांना चिन्ह सांगण्यासाठी आणखीन एकदा आपल्या प्रभागाची फेरी करावी लागणार आहे.